शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

बाभळीमुळे मानव-वन्यजीव संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:40 PM

शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देइको-प्रोचे वनमंत्र्यांना निवेदन : समस्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.यावेळी वनमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उर्जानगर परिसरातील वाघ समस्या आणि त्यावरील उपायाबाबत कार्यवाही करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आलेले आहे. उर्जानगर परिसरात बिबट, अस्वल यासोबत आता वाघांचे दर्शन सामान्य नागरिकांना येता-जाता होऊ लागले आहे. यामुळे या परिसरासह लगतच्या गावात मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होत आहे. मागील दोन वर्षात अनेक अस्वल वीज केंद्र आणि वेकोलिच्या वसाहतीमधून वनविभागाने पकडून इतरत्र हलविले आहे. मात्र समस्या आजही कायमच आहे, कारण मूळ समस्येवर उपाययोजना होताना दिसत नाहीे. मागील एक वर्षांपासून चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र व लगतच्या गावातील शिवारात वाघिणीने पिल्लांसह बस्तान मांडले आहे. नुकतेच नवजात पिल्लांसह पुन्हा दुसऱ्या वाघिणीचे दर्शन येथील नागरिकांना झालेले आहे, तसे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. एकंदरीत सदर कुत्रीम जंगल हे आता वाघासारख्या प्राण्यांचे प्रजनन केंद्र होत चालले आहे. ही चंद्रपूर शहराकरिता मोठी धोक्याची घंटा आहे. याचा प्रत्यय मागील काही महिन्यांपासून सातत्याने येत आहे.मागील अनेक वर्षांपासून या परिसरांमध्ये काटेरी बाभूळ म्हणजे प्रोसोपिस या प्रजातीच्या वनस्पतीचे कृत्रिम जंगल तयार झालेले आहे. दाटी-वाटीने वाढणाºया या वनस्पतीमुळे जंगलसदृश्य स्थिती निर्माण होते. या परिसरात मोकाट जनावरांची संख्यासुध्दा मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे वन्यप्राणी यांना योग्य लपण, खाद्य व पाणी या ठिकाणी मिळते. पूर्वी बिबट आणि अस्वल यांचे वास्तव्य असलेले हे कुत्रिम जंगल वाघांनासुध्दा आकर्षित करू लागल्याचे निवेदनात म्हटले आहे.