शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

बर्फ बनविण्याचा व्यवसाय आला संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:34 PM

गेल्या महिन्यापासून तापमानाने उचांक गाढला आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. असे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत आहे. यामुळे बर्फ व्यवसाय काहीसा अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देअनेकांना रोजगार : थंड पाणी घरपोच मिळत असल्याने व्यवसाय घटला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या महिन्यापासून तापमानाने उचांक गाढला आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. असे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत आहे. यामुळे बर्फ व्यवसाय काहीसा अडचणीत आला आहे.लग्न, दूधविक्रेते, रसवंतीगृह, शीतपेयांची दुकाने आदी व्यावसायिकांकडून उन्हाळ्यामध्ये बर्फाला मागणी असते, चंद्रपूर शहरामध्ये काही प्रमाणात आईस फॅक्टरी आहे. एका आईस फॅक्टरीमध्ये १० ते २० मजूर काम करतात. एप्रिल, मे आणि जून या तीनच महिन्यात बर्फाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यानंतर मात्र हा धंदा मंदावतो. यावर्षी असलेल्या दुष्काळामुळे काही प्रमाणात व्यवसायावर परिणाम पडला आहे.उन्हाळ्यातील तीन महिने वगळता इतर नऊ महिने ना नफा न तोटा या तत्वावरच बर्फाचा व्यवसाय करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत असून, हा व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. केवळ काही व्यावसायिकांच्या भरवश्यावरच हा व्यवसाय चालत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.४८ तासात होते एक लादी तयारबर्फाची एक लादी तयार होण्यासाठी ४८ तासांचा वेळ लागतो. दिवसभरात एका आईस फॅक्टरीतून ४० ते ५० लाद्या तयार होतात. लादी तयार करण्यामागे मोठी मेहनत असली तरी ३०० ते ३५० रुपये दराने विक्री कली जाते. व्यवसायात स्पर्धा असल्याने भावात चढउतार होत असतात.आधुनिक साधनांमुळे बर्फाला मागणी घटलीप्रत्येकाच्या घरी फ्रीज तसेच व्यावसायिकांकडे मोठा फ्रीज उपलब्ध झाल्यामुळे बर्फाला मागणी घटली आहे. ग्रामीण भागातही सिंगल फेज लाईटवर चालणारे डी फ्रीज लाईटवर चालणारे फ्रीज आल्यामुळे बर्फाची मागणी घटली. दूध विक्रेते, लग्न समारंभ, रसवंती चालकांकडूनच मागणी होते. इतर महिन्यात ना नफा ना तोटा तत्वावर व्यवसाय सुरु ठेवावा लागतो.केवळ उन्हाळ्यात मागणी वाढतेएप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तापमानात वाढ झालेली असते. लग्नाचे मुहूर्तही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे गार पाण्याची मागणी असल्याने लोक बर्फाची लादी घेऊन पाण्याच्या साठ्यात सोडतात.त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात बर्फाच्या लाद्यांना मागणीत वाढ होत असल्याचे आईस फॅक्टरी चालकांचे म्हणणे आहे.