शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

बल्लारपुरात प्रदूषित हवा, पाणी अन् धुरामुळे आजार, श्वासही कोंडला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 6:20 PM

Chandrapur : नागरिकांना भेडसावताहेत विविध आरोग्याच्या समस्या

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शहर अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. धूळ, प्रदूषित पाणी, धूर, प्लास्टिक, वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. तर प्राणघातक वायू प्रदूषणामुळे ज्येष्ठाचा श्वास कोंडला आहे.

शहरात पेपर फॅक्टरी, कोळसा उत्पादन, लाकूड आणि वृक्षांनी नटलेले घनदाट वनवैभव असल्यामुळे बल्लारपूर शहराचे महत्त्व वाढले आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारे वनवैभव व उद्योगामुळे होणारे प्रदूषण याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

वेकोलि परिसरात कोळशाच्या धुरांमुळे नागरिकांना डोळ्यांचा त्रास, दमा, हृदयविकार, पोटाचे विकार, विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.

वर्धा नदीही प्रदूषितबल्लारपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पवित्र पाणी काळे झाले आहे. अनेक वर्षांपासून उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाले आहे. ते पिण्यायोग्य नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले आहे. प्रत्येक सणासुदीला भाविक वर्धा नदीच्या गणपती घाटावर उत्सव साजरा करण्यासाठी येतात व पाणी ग्रहण करतात व प्रदूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र याकडे प्रदूषण मंडळ नेहमीच दुर्लक्ष करत आहे.

धूळ प्रदूषण मापक यंत्र बेपत्ताशहरातून २४ तास शेकडो वाहनातून लोखंड, कोळसा, सिमेंट, लाकूड, बांबू, फ्लाय ऐशचे कण पडणाऱ्या धुळीने प्रदूषण होते. त्यामधून निघणारे पार्टीकल नागरिकांच्या डोळ्यात जाऊन डोळे खराब होत आहे. अनेक आजार जडले आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नगर परिषदेच्या शेतावर लावलेले धूळ प्रदूषण मापक यंत्र बेपत्ता झाले आहे.

शहरातील जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली असल्याने हजारो नागरिक विविध आजारांचे बळी ठरत आहेत. याकडे जिल्हा प्रशासन व प्रदूषण मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.-अमित पाझारे, पर्यावरणप्रेमी, बल्लारपूर

 

टॅग्स :World Environment DayWorld Environment Daypollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यchandrapur-acचंद्रपूर