शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले

By admin | Published: March 08, 2017 12:40 AM

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक शहर व गावांना अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला.

शेतपिकांचे अतोनात नुकसान : वादळामुळे झाडे कोसळली, अनेक गावांतील बत्ती गूलचंद्रपूर : मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक शहर व गावांना अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. कोठारी, बल्लारपूर, राजुरा येथे गारांच खच पाहायला मिळाले. राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यात अर्धा ते एक तास झालेल्या वादळी पावसाने हरभरा, तूर, लाखोरी, मिरची, मुंग आदी रबी शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून वीज तारांवर झाडे कोसळल्याने अनेक गावांतील बत्ती गूल झाली. बल्लारपूरला दोनदा झोडपलेमंगळवारला दुपारी ३ वाजता वादळी पावसाने गारांसह हजेरी लावल्याने बल्लारपूरकरांची चांगलेच तारांबळ उडाली. वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि विद्युत तारा तुटल्या. पहिल्या वादळी व गारपीटीच्या तीव्र पावसानंतर परत एक तासाने गारांसह पाऊस बरसला. येथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण, दुपारी ११ वाजता प्रखर उन्ह असताना अडीच-तीन वाजताचय सुमारास वातावरणात बदल होऊन ३ वाजता तुरळक पाऊस सुरू झाला. बघता बघता वादळ सुटले आणि पाऊस झाला व गाराही पडल्या. हा वादळी पाऊस व गारांचा मारा बंद झाल्याच्या एक तासानंतर परत ढगांनी गडगडाट सुरु केला व पाऊस सुरु झाला. सोबत गाराही पडू लागल्या. पण, यावेळेला तीव्रता कमी होती. या वादळी पावसामुळे वीज खंडीत झाली. उशीरापर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होता. पावसामुळे तालुक्यात मिरची तसेच कापस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. (तालुका प्रतिनिधी) घुग्घुस परिसरात पाऊसघुग्घुस : मंगळवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेतीन वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. शहरात विजेचा लंपडाव सुरू असून मंगळवारी साडेअकरा वाजतापासून तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद होता.कोठारी परिसरात गारांचा पाऊसकोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरात मंगळवारी दुपारी ३.३० वाजतापासून ५ वाजेपर्यंत गारांसह वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. ३.३० वाजता वादळासह ५ वाजेपर्यंत गाराचा पाऊस सुरु होता. वादळाने अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले. कोठारी परिसरात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, मुंग, उदड,, मिरची पिकासह अनेक पिकांची लागवड झाली असून काहीनी कापनी सुरु केली तर काही कापणीवर येवून आहेत. अशात अवकाळी पाऊस गारासह बरसल्याने शेतपिकाची प्रचंड नासाडी झाली आहे. या नुकसानीची चौकशी करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जि.प. सदस्य वैशाली बुद्धलवार यांनी केली आहे. (वार्ताहर)