शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

मानव-वन्यजीवन संघर्षात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 11:19 PM

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रालगत येणाऱ्या वनपरिसरातमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.

ठळक मुद्देअहवाल : विकास योजनांमध्ये लोकसहभागाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रालगत येणाऱ्या वनपरिसरातमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र, वन्य प्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप, नैसर्गिक हालचाली, आहार तसेच प्रजननामध्ये व्यत्यय निर्माण करण्याचे प्रकार न थांबल्याने मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढत होत असल्याचे मागील सात वर्षांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर वनवृत्तातील वनक्षेत्र हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या संरक्षीत क्षेत्रालगत येते. या क्षेत्रातील घनदाट वनसंपदा व जैविक विविधता देशभरातील पर्यटक तसेच संशोधकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाघ व तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने पर्यटकांचे पाऊल आपुसकच ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाकडे वळतात. सदर क्षेत्रालगतच बरीच गावे आहेत. गुरे चराईसाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी बहुतांश नागरिक जंगलावर निर्भर आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासात ग्रामस्थांचा वावर वाढला. त्यातून वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक हालचाली, आहार आणि प्रजननमध्ये व्यत्यय निर्माण होऊन वन्यप्राण्यांकडून गावकरी अथवा पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. लोकसंख्या वाढ, वनाचा वनेत्तर कामासाठी उपयोग, वाढते औद्योगिकरण आणि वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात निर्माण झालेले अडथळे या बाबीही मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्य चांदा क्षेत्रामध्ये २०११ ते १२ या कालखंडामध्ये मानव व वन्यजीव संघर्षाच्या ५ हजार ३४४ घटना घडल्या होत्या. त्यावेळी वनविभागाने जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्ला प्रकरणात नुकसान झालेल्या नागरिकांना अनुदान देण्यात आले. परिणामी, २०१२-१३ वर्षात ही संख्या ३ हजार ८३ इतकी झाली. २०१३-१४ वर्षात सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता. शिवाय, पशुधन व पीक हाणीच्या ४ हजार ६९० घटना घडल्या. दरम्यान, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्याची संख्या झपाट्याने वाढली. वन विभाग व वन्यजीव संरक्षण विभागाने जागृतीची मोहीम गतिमान करून हा कमी झाला नाही. वन विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार ही संख्या ५ हजार १३० पर्यंत पोहोचली. २०१६-१७ हे वर्ष तर वनविभागासह अभ्यासकांसाठीही चिंतेचे ठरले होते. या वर्षामध्ये ७ हजार २४७ घटना घडल्या. वनाचा वनेत्तर कामासाठी उपयोग टाळणे व वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न होऊनही मानव-वन्यजीव संघर्षाची धग कायम होती. २०१७-१८ या वर्षातही या घटनांची दाहकता कायम असल्याचे अहवालातून दिसून येते. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना प्रभावीपणे राबवूनही मानव- वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकला नाही. चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्यचांदा क्षेत्रातील वनविकास आणि वन्यजीव संरक्षणांसाठी दीर्घकालिन उपाययोजना सुरू आहेत. विकास योजनामध्ये लोकसहभागीही वाढविला जात आहे. मात्र हा संघर्ष कमी न झाला नाही. त्यामुळे योजनेतील त्रुटी शोधून त्या दूर केल्यास मानव आणि वन्यजीव प्राण्यांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलू शकतो, असा आशावाद प्रकल्प क्षेत्रालगतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, वन्य व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.विकास योजनांचे करा मूल्यांकनवन्यप्राण्यांच्या हल्ला प्रकरणात तातडीने अनुदान देण्याची प्रभावीपणे सुरू आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या घटली. मात्र मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटनांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर पर्याय म्हणून शासनाने अनेक योजना सुरु करूनही मूळ समस्या संपली नाही. त्यामुळे योजनांचे मूल्यांकन करण्याची गरज आहे.