शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वाहनांची थांबलेली चाके गतिमान होताच अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 07:00 IST

Accident Chandrapur News वाहनाची चाके सुरळीत होताच पुन्हा अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

ठळक मुद्देनऊ महिन्यात ४०७ अपघात १८२ जणांचा मृत्यू, २९९ जण जखमी

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने अपघाताची संख्या रोडावली होती. मात्र वाहनाची चाके सुरळीत होताच पुन्हा अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर जिल्हात सुमारे १२२ अपघात झाले आहेत. यामध्ये ५७ जणांचा बळी गेला असून ७१ जण जखमी झाले आहेत.

कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता संपूर्ण वाहतूक बंद होती. परिणामी जिल्ह्यातील अपघात आपोआपच कमी झाले होते. मात्र जुलै महिन्यात शासनाने लॉकडाऊन हटविले, पुन्हा वाहनाची चाके सुरळीत झाली.दुचाकी व चारचाकीधारक वाहतूक नियम पायदळी तुडवत बेफीकीर वाहन पळवू लागले. परिणामी अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

अपघाताची मुख्य कारणेवाहतूक विभागाने वाहन चालवतानाची नियमांवली तयार केली आहे. मात्र अनेकजण वाहन नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवतात.वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, रात्रीच्या वेळी वाहन चालवणे, वाहनाची गती जास्त असणे.

वाहतूक विभागाकडून वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी जनजागृती सुरु आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालवावे.- हृदयनारायण यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :Accidentअपघात