शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दारूविक्रीचे वाढले टार्गेट; भरणार 21 कोटींचा गल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 05:00 IST

१ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. राज्यातील सत्ता बदलानंतर २७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविली. प्रत्यक्षात ७ जून २०२१ पासून दारूविक्री सुरू झाली. जिल्ह्याला एप्रिल २०२२ पर्यंत १५ कोटींचा महसूल मिळाला आहे. डॉ. कुणाल खेमनार समितीने मार्च २०२० मध्ये अहवाल कॅबिनेटपुढे सादर केला. समितीपुढे ४३ हजार ६२७ निवेदन दारूबंदी उठवण्यासाठी तर २५ हजार ८२७  हे दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यावर शिक्कामोर्तब केले. या घटनेला बुधवारी एक वर्षे पूर्ण होत आहे. दारू विक्रीतून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला १५ कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान,  दारू विक्रीचा वेग लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाला २० कोटी ७५ लाखांचा टार्गेट देण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदीसाठी संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर अनेक संघटना हे काम करीत होत्या; पण चंद्रपुरात ५ जून २०१० ला दारूबंदीचा खरा लढा सुरू झाला. चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूल श्रमिक एल्गार संघटनेने दारूबंदीची मागणी करणाऱ्या संघटनांना संघटित केले. ४ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२० रोजी दारूबंदीच्या मागणीसाठी चिमूर ते नागपूर पदयात्रा (विधानसभेवर) काढण्यात आली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आवाज उठविला. त्यामुळे फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती तयार केली.समितीने  फेब्रुवारी २०१२ मध्ये मुख्यमंत्र्यांना अहवाल सुपुर्द केला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. राज्यातील सत्ता बदलानंतर २७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविली. प्रत्यक्षात ७ जून २०२१ पासून दारूविक्री सुरू झाली. जिल्ह्याला एप्रिल २०२२ पर्यंत १५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

२ लाख ८२ हजार सूचना आल्याडॉ. कुणाल खेमनार समितीने मार्च २०२० मध्ये अहवाल कॅबिनेटपुढे सादर केला. समितीपुढे ४३ हजार ६२७ निवेदन दारूबंदी उठवण्यासाठी तर २५ हजार ८२७  हे दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आली होती.

१३ सदस्यांची झा समितीमंत्रालयात पुन्हा उच्चस्तरीय बैठक झाली, या बैठकीत आणखी एक समिती स्थापून आढावा घेण्याचे निश्चित झाले. दारूबंदीबाबत अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी १२ जानेवारी २०२१ रोजी १३ सदस्यांची झा समिती गठित झाली. या समितीने ११ मार्चला सरकारला अहवाल दिला. 

दारूबंदी हटविण्यासाठी नेमके काय-काय घडले ?३ फेब्रुवारी २०२० पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना समिती गठित करण्याचे निर्देश दिले.  दारूबंदीचे फायदे व तोटे याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. खेमनार यांच्या अध्यक्षेखाली समीक्षा समितीने १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत लिखित स्वरूपात अभिप्राय मागविले होते. 

२७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने हटविली दारूबंदीझा समितीच्या शिफारशीनंतर राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ७ जून २०२१ पासून जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू झाली. आता दुकानाची संख्या वाढली.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी