शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

चंद्रपूर, बल्लारपुरात ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांनी शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची माहिती देवून ‘जनता कर्फ्यू’ची आवश्यकता मांडली होती.

ठळक मुद्देआजपासून चार दिवस ठप्प : रूग्णालय, औषधालय सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामूहिक संसर्गाची लक्षणे दिसत असल्याने कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी चंद्र्रपूर महानगरपालिका क्षेत्र व दुर्गापूर, पडोली, ऊर्जानगर तसेच बल्लारपूर शहरात १० सप्टेंबर गुरूवार ते १३ सप्टेंबर रविवारपर्यंत ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांनी शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची माहिती देवून ‘जनता कर्फ्यू’ची आवश्यकता मांडली होती. चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, चंद्रपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री व सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनीही शहरातील स्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सरनाईक आदींनी मते जाणून घेतली. त्यानंतर जनता कर्फ्यू लावण्यावर सर्वांचे एकमत झाले.बल्लारपुरात नऊ पथक सज्जजनता कर्फ्यू कालावधीत प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होवू नये, यासाठी बल्लारपुरात महसूल, पोलीस व नगर परिषद प्रशासनाकडून नऊ पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हाळे, मुख्याधिकारी विजयकुमार नाईक, तहसीलदार जयंत पोहनकर, ठाणेदार एस. एस. भगत यांच्या उपस्थितीत बुधवारी व्यापारी, सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधींची बैठक झाली.चंद्रपुरातील सीए कार्यालये बंदचंद्रपूर चार्टर्ड अकाऊंन्टट असोसिएशननेही कोरोनाविरूद्ध १० ते २० सप्टेंबरपर्यंत कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत घेतला आहे. यावेळी सीए असोसिएशनचे दामोधर सारडा, रमेश मामीडवार, अंजुम गौस, सौरभ खोसला, शादाब चिनी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रपूरकरांनी घेतलेला ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय योग्य आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन चंद्रपूर सीए असोसिएशनने केले आहे.काय सुरू राहणार ?सर्व रूग्णालये, औषधालये, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय तसेच एमआयडीसीमधील सर्व आस्थापना, वेकोलि सुरू राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण सुरू राहणार आहे. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील परंतु ग्राहक सेवेसाठी बंद ठेवण्यात आले आहे.सराफा बाजार आठ दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून चंद्रपुरातील सराफा व्यावसायिकांनी बुधवारपासून स्वत:हून ‘लॉकडाऊन’ सुरू केले. १६ सप्टेंबरपर्यंत सराफा प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी शहरातील सराफा दुकाने बंद होती. त्यामुळे सराफा दुकानांसमोर शुकशुकाट होता.काय बंद राहणार ?चंद्रपूर मनपा क्षेत्र व दुर्गापूर, पडोली, उर्जानगर तसेच बल्लारपूर शहरातील सर्व किराणा, भाजी, फळे दुकाने, पान ठेले, चहा टपऱ्या व फुटपाथवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. जनतेने विनाकारण घराबाहेर निघू नये, मास्क वापरावे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.