शहरं
Join us  
Trending Stories
1
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
3
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
4
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
5
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
6
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
7
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
8
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
9
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
10
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
11
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
12
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
13
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
14
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
15
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
16
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
17
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
18
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
19
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
20
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."

टीईटी पास नसलेल्या ५७ शिक्षकांची नोकरी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:18 AM

चंद्रपूर : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा पात्र नसलेल्या आणि नोकरीवर असलेल्या जिल्ह्यातील माध्यमिक ...

चंद्रपूर : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा पात्र नसलेल्या आणि नोकरीवर असलेल्या जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या ५७ शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.

राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमच्या तरतुदीनुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र आहे. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टीईटी परीक्षा शिक्षक होण्यासाठी बंधनकारक केली आहे. असे असले तरी काही खासगी शिक्षक संस्थानी शाळांमध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांना नियुक्ती केली आहे. दरम्यान, या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी राज्य शासनाने मुदतही दिली होती. मात्र निर्धारित मुदतीमध्ये या शिक्षकांनी टीईटी पास केली नाही. परिणामी नुकत्याच लागलेल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.

राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये नेमणूक केलेले शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा सर्वांवर आता गडांतर येणार आहे.

मागील काही वर्षांपासून राज्यात डीएड आणि बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र यातील अनेकांना नोकरी लागली नाही. दुसरीकडे टीईटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून नोकरी करीत असलेले पगार घेत आहेत. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर सदर शिक्षक पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे बेरोजगार असलेले टीईटी उत्तीर्ण विद्यार्थीही आपल्यावरील अन्यायासाठी प्रशासकीय स्तरावर दाद मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

बाॅक्स

एकूण शिक्षक- १४,००५

अनुदानित शाळांतील शिक्षक-४,४७४

कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक-३,१३२

बाॅक्स

टीईटी पास नसलेले शिक्षक (माध्यमिक) ५७

कोट

टीईटी उत्तीर्ण संदर्भात शासनस्तरावर जे आदेश येतील त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार की नाही याबाबत आत्ताच बोलणे उचित ठरणार नाही.

-उल्लास नरड

शिक्षणाधिकारी, माध्यमिक

कोट

जिल्ह्यातील काही शिक्षकांनी टीईटी परीक्षा पास केली नसेल. तर त्यांना आणखी मुदतवाढ द्यावी, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही. नोकरीवरून काढून टाकल्यास त्यांच्या मुलाबाळांसह कुटुंबाचा प्रश्न उभा होण्याची शक्यता आहे.

-प्राचार्य नरेंद्र बोबडे

अध्यक्ष,जिल्हा मुख्याध्यापक असो.चंद्रपूर

कोट

टीईटी पास नसलेल्या शिक्षकांना मुदतवाढ दिली पाहिजे. या शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. शासनाने त्यांना मान्यता सुद्धा दिली आहे. पगार दिला जातो. त्यामुळे आता कारवाई करणे हे अत्यंत चुकीचे आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर नियुक्ती झाली तर त्यांच्यावर कारवाई करावी.

-सुधाकर अडबाले

सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ