शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

दुष्काळग्रस्त यादीत सहभाग न होणे हा जिल्ह्यावर अन्याय

By admin | Published: May 24, 2016 1:17 AM

जिल्ह्यातील एक हजार २७६ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी असतानाही चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत झाला नाही.

वडेट्टीवारांचे प्रशासनाला पत्र : कर्ज पुनर्गठनाअभावी शेतकरी संकटात चंद्रपूर : जिल्ह्यातील एक हजार २७६ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी असतानाही चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत झाला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांना पुन्हा संकटाच्या खाईत लोटण्याचे काम सरकारने केले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला.आमदार वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारने २२ मार्चला दुष्काळग्रस्त गावांना ३६० कोटी रूपयांचा दुष्काळ निधी वाटप केला. मात्र तेव्हा जिल्हा चंद्रपूर निल दाखविण्यात आल्याने छदामही मदत मिळू शकली नाही. नंतरच्या काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाहणीनंतर जिलह्यातील एक हजार २७६ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी आली. तसा अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र जिल्ह्याचा उल्लेख दुष्काळग्रस्त यादीत तर सोडा दुष्काळसदृष्ष्य गावांच्या यादीतही झाला नाही. जिल्ह्यातील दुष्काळी गावांचा समावेश यात झाला असता तर दुष्काळात मिळणारी मदत येथील शेतकऱ्यांना मिळाली असती. त्यातून कोलमडलेला शेतकरी उभा राहू शकला असता. शेतकऱ्यांचा हंगाम तोंडावर येत आहे. मात्र अद्यापही कृषीकर्जासाठी राष्टीयकृत बँकांना सरकारने पैसा दिलेला नाही. ३७ टक्के शतकरी अद्यापही कर्ज वाटपापासून वंचित आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आजपर्यंत फक्त ४३ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जपुरवठा झाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन न झाल्याने शेतकरी कर्जापासून वंचित आहे. नाईलाजाने त्यांना सावकाराच्या दाराशी जाण्यासाठी राज्य सरकारच भाग पाडत आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड नैराश्य आल्याने त्याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, सोमवारी सकाळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेवून परिस्थिती मांडली. बँकांची बैठक घेवून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे निर्देश देण्याची आणि ५० टक्के सबसिडीवर बियाणे देण्यासाठी सरकारकडे सिफारस करण्याची मागणी त्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)