शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

दक्षिण मध्य रेल्वेगाड्या बल्लारशाहपर्यंत सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:27 AM

सुदर्शन निमकर यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी सास्ती : कोरोना महामारी रोगामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काही गाड्या फक्त ...

सुदर्शन निमकर यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

सास्ती : कोरोना महामारी रोगामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काही गाड्या फक्त तेलंगणा राज्याच्या सिरपूर - कागजनगर आणि सिरपूर टाऊनपर्यंत सुरू केल्या आहेत. त्या कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्यात आणल्या जात नाहीत. त्या गाड्या दक्षिण मध्य रेल्वेच्या शेवटचे स्टेशन बल्लारशाहपर्यंत आणण्याची मागणी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेची मर्यादा महाराष्ट्राच्या बल्लारशाह स्टेशनपर्यंत आहे. परंतु लॉकडाऊन काळात बल्लारशाहकडे येणाऱ्या गाड्या बंद केल्यामुळे महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि जिल्हा मुख्यालय, चंद्रपूर परिसरातील प्रवाशांना अडचणी येत आहेत. हा महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. तेलंगणातील कागजनगर आणि महाराष्ट्राचा बल्लारशाह दरम्यानचा भाग हा सीमाभाग आहे. या परिसरात बहुतांश तेलगू भाषिक नागरिक राहात असून, या भागाचा मोठ्या प्रमाणात तेलंगणातील राज्यातील गावांशी जनसंपर्क असल्यामुळे दैनंदिन रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. सीमा भागातील लोकांना सुविधा देण्यासाठी रेल्वेगाड्या सिकंदराबाद आणि काझीपेठ ते सिरपूर - कागजनगर ते बल्लारशाहपर्यंत वाढविल्या पाहिजेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे गाड्या बल्लारशाहपर्यंत पुन्हा सुरू कराव्यात आणि सिरपूर - कागजनगरपर्यंत चालणाऱ्या गाड्या बल्लारशाहपर्यंत वाढवाव्यात. याचबरोबर नागपूरहून सिकंदराबादकडे जाणारी इंटरसिटी एक्स्प्रेस माणिकगड रेल्वे स्टेशन आणि विरूर स्टेशनवर थांबत होती. परंतु ही रेल्वेगाडी रायपूर ते सिकंदराबादपर्यंत धावत असल्याने माणिकगड स्टेशन आणि विरूर स्टेशनचा थांबा बंद करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत असून, या रेल्वेगाडीचे थांबे देण्यासाठी नागरिक मागणी करीत आहेत. नागरिकांची ही मागणी लक्षात घेता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्या बल्लारशाहपर्यंत सोडण्याच्या मागणीचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाठविले आहे.