शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीक कर्जाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:56 PM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती.

ठळक मुद्देतुटपुंज्या मदतीचा परिणाम : स्वेच्छेने तीन हजार शेतकऱ्यांनीच काढला विमा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती. मात्र गतवर्षीच्या विमा कंपनीकडून मिळालेल्या तुटपुंजा मदतीच्या अनुभव पुढे असल्याने यंदाच्या खरिप हंगामात केवळ कर्जदार शेतकऱ्यांनीच विमा काढला तर हजारो बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली.खरिप २०१८ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कर्जदार, बिगर कर्जदार व भाडीपट्टवरील शेतकरी विम्याचा लाभ घेऊ शकतात. चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उबंरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदल्यास अथवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान व काढणी पश्चात नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तीपासून नुुकसान टाळण्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते, असा दावा सरकार व विमा कंपन्यांनी केला. जिल्ह्यातील अधिसुचित पिकांसाठी हा विमा लागू आहे. विमा संरक्षित रक्कमेच्या दोन टक्के, नगदी व व्यापारी पिकांसाठी पाच टक्के या दराने विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. संबंधित विमा कंपनीकडे २४ जुलै २०१८ प्रस्ताव सादर करावे, असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कळविण्यात आले होते. जिल्ह्यासाठी आयसीआयीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या कंपनीने व्यापक स्वरूपात जागृती केली नाही. परिणामी, बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमाकडे पाठ फिरवली, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.५६ हजार हेक्टर क्षेत्राचे संरक्षणकर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५६ हजार ४७३ हेक्टर क्षेत्रावरील खरिप पिकाच्या संरक्षणाची हमी मिळाली. संबंधित कंपनीने योग्य माहिती संकलित करून विमाधारक शेतकऱ्यांना सरकारशी केलेल्या करारानुसार मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी कृषी अभ्यासकांनी केली.४८ हजार ४३५ विमाधारक शेतकरी कर्जदारयंदाच्या खरिप हंगामासाठी जिल्ह्यातील ४८ हजार ४३५ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. कर्जदार शेतकºयांना बंधनकारक असल्याने ही संख्या वाढू शकली; अन्यथा १० हजार शेतकरीदेखिल स्वत:हून पीक विमा काढू शकले नसते, अशी कृषी विभागातच चर्चा सुरू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांचा विमा हफ्ता संबंधित कंपनीकडे जमा झाला आहे. तुटपुंजा मोबदला मिळाला तर पुढील हंगामात बिगर कर्जदार शेतकरी विम्यापासून पुन्हा दूरावू शकतात.