शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

साक्षरता ही काळाची गरज- विखार

By admin | Published: September 22, 2015 1:44 AM

साक्षरता ही काळाची गरज असून आजच्या काळात विविध पद्धतीने साक्षर होणे गरजेचे आहे. त्यामध्ये राजकीय साक्षरता व

ब्रह्मपुरी : साक्षरता ही काळाची गरज असून आजच्या काळात विविध पद्धतीने साक्षर होणे गरजेचे आहे. त्यामध्ये राजकीय साक्षरता व संगणकसाक्षरता अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांपासून प्रेरणा घेऊन आपल्या जवळच्या एक व्यक्तीला तरी साक्षर करावे, असे प्रतिपादन प्राचार्य रवींद्र विखार यांनी केले.निरंतर प्रौढ शिक्षण व विस्तार सेवा अंतर्गत लोकसंख्या शिक्षण मंडळ आणि महिला अध्ययन व सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयामध्ये साक्षरता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बोलताना गोविंदराव मुनघाटे यांनीही आपले विचार केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकाडे होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधी, लोकसंख्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मोहन कापगते, महिला अध्ययन व सेवा केंद्राचे प्रभारी प्रा. अजित खाजगीवाले उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांनी विद्यार्थ्यांना साक्षरतेचे महत्व पटवून सांगितले. याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल प्रा. डॉ. रविंद्र विखार यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक आणि उपक्रमाबद्दलची माहिती प्रा. डॉ. मोहन कापगते यांनी दिली तर संचालन प्रा. पद्माकर वानखेडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)