शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

मुख्यालयाला ‘खो’ अडचणींचे

By admin | Published: October 03, 2015 12:55 AM

नागभीडच्या विकासाला जी अनेक कारणे मारक ठरत आहेत, त्यापैकी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाला खो हे एक प्रमुख कारण आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : नागभीड तालुक्यातील नागरिक त्रस्तघनश्याम नवघडे नागभीडनागभीडच्या विकासाला जी अनेक कारणे मारक ठरत आहेत, त्यापैकी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाला खो हे एक प्रमुख कारण आहे. पण कोणताच लोकप्रतिनिधी यासंदर्भात आवाज उठवत नसल्याने या अधिकारी कर्मचाऱ्यांंचे चांगलेच फावत आहे. पण या प्रकाराने नागभीडची अर्थव्यवस्था दिसेंदिवस खिळखिळी होत असून याचे भान मात्र कोणालाही नाही.तालुक्याचे मुख्यालय म्हणून या ठिकाणी अनेक कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालय आहेत. हे कार्यालय आणि शाळा-महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर ती हजारोंच्या घरात जाते. पण यातील किती अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि प्राध्यापक नागभीडमध्ये वास्तव्याला राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. शेकडा ७० टक्के अधिकारी व अन्य कर्मचारी हे नागभीड येथे राहतच नाही. हे निर्विवाद सत्य आहे. हेच अधिकारी आणि कर्मचारी नागभीड येथे वास्तव्याने राहिले असते तर येथील प्रत्येक व्यवसायाला बळकटी मिळाली असती. येथील किराणा, कापड, औषधी, हॉटेल हेच नाही तर येथील प्रत्येक व्यवसाय फोफावला असता. घरांची मागणी वाढली असती. पण हे अधिकारी कर्मचारी येथे राहतच नसल्याने या केवळ बाता ठरल्या आहेत. मुख्यालयाचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतो, तेव्हा केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाच टार्गेट केले जाते. पण या व्यतिरिक्त अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे काय, काही अंशी नागभीडचा विकास साधायचा असेल तर या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा मुख्यालयात राहण्यासंदर्भात विचार व्हायला पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला पाहिजे.येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, कृषी विभागाचेच उपविभागीय कार्यालय, सां.बा. विभागाचे उपविभागीय कार्यालय, सिंंचाई, विद्युत, विभागाचे उपविभागीय कार्यालय, पशुवैद्यकीय विभागा, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, गो.वा. महाविद्ययालय, शिक्षण विभाग अशी अनेक विभागांची यादी या ठिकाणी देता येईल. यातील केवळ बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारीच नागभीड येथे वास्तव्याने आहेत. शेकडा ७० टक्के कर्मचारी एकतर ब्रह्मपुरी येथे राहतात. नाही तर नागपूर- चंद्रपूर येथून अपडाऊन करतात. येथील कित्येकांनी तर ब्रह्मपुरीत टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत.