शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

मजीप्राचे अभियंते-कर्मचारी बेमुदत संपावर

By admin | Published: March 07, 2017 12:40 AM

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व अभियंता व कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहे. मजीप्राच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी धरणे धरले आहे.

कार्यालयासमोर धरणे : चंद्रपूर जिल्ह्यात दोन कोटींचा प्रश्नचंद्रपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व अभियंता व कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहे. मजीप्राच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी धरणे धरले आहे. दिलेल्या आश्वासनाला १३ महिने पूर्ण होऊनही मंत्रिमंडळ बैठकीतील टीपण चर्चेला न घेण्यात आल्याने जीवन प्राधिकरणातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर ठोस निर्णय होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय मजीप्रा संयुक्त संघटना संघर्ष समितीने घेतला आहे.जीवन प्राधिकरणाचे विविध शासकीय आणि निमशासकीय खात्यांकडे पाणीपुरवठ्यापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही शासकीय कार्यालयाने आणि संस्था देयक अदा करीत नसल्याने मजीप्राचा खर्च वाढला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेतन व भत्त्यांवर सुमारे साडेतीन कोटींचा खर्च आहे. तर वसुली मात्र केवळ दीड कोटी रुपये होत आहे. त्यामुळे मजीप्राचा डोलारा सांभाळणे दिवसेंदिवस कठिण जात आहे. अशीच स्थिती संपूर्ण राज्यात आले. गेल्या काही वर्षांपासून मजीप्रामध्ये कार्यरत अभियंते आणि कर्मचारी आपापल्या संघटनांच्या माध्यमातून शासनाला अवगत करीत आहेत. ही संस्था शासनाने ताब्यात घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनाची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी करीत आहेत.मजीप्राच्या अधिनियम कलम २७ मध्ये शक्य असेल तर प्राधिकरण राज्य शासनाकडून अनुदान किंवा अर्थसहाय्याची रक्कम घेतल्यानंतर या अधिनियमातील आपली कार्य तोट्यात चालविणार नाही आणि कलम २८मध्ये राज्य शासनास त्याबाबत योग्यरीतीने विनियोजन करून शासन निर्धारित करील अशा अटी व शर्तीवर प्राधिकरणाला वेळोवेळी अनुदाने किंवा अर्थसहाय्य देता येईल, असे म्हटले आहे. तरीही राज्य शासन आर्थिक सहाय्य देण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही.मजीप्राच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनाचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी डिसेंबर-२०१५मध्ये सर्व संघटनांनी एकत्रित आंदोलन केले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ८ डिसेंबर २०१५ रोजी तीन महिन्यांत हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे डिसेंबर-२०१५मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांना तत्कालीन पाणीपुरवठा मंत्र्यांनी तीन महिन्यात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला १३ महिने झाल्यानंतरही मंत्रिमंडळाच्या बैठकीतील टीपण चर्चेला घेण्यात आले नाही. परिणामी हा प्रश्न चिघळला आहे. आता मजीप्रातील सर्व संघटनांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.संयुक्त संघटना संघर्ष समितीने चंद्रपूर येथील मजीप्राच्या कार्यालयासमोर मंडप टाकून आंदोलन सुरू केले आहे. त्यात मजीप्रातील सर्व अभियंते व कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघर्ष समितीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आनंद भालाधरे करीत आहेत. आंदोलनात उपअभियंता पी. जी. घुटके, शाखा अभियंता आर. जी. गुरूमुखी, उपअभियंता एस. ए. पाटील, शाखा अभियंता बाराहाते आदींसह सर्व कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी होते. (प्रतिनिधी)वेतन-भत्त्याचे दायित्व स्वीकारावेपिण्याच्या पाण्याची मूलभूत मानवी गरज भागविण्याकरिता शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही अंगीकृत संस्था तयार केली आहे. त्याद्वारे शासनाच्या विविध कार्यक्रम आणि योजनांचे नियोजन व नियमन करण्यात येते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी आणि ही संस्था सुरळीत चालावी, याकरिता जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतनाचे दायित्व शासनाने स्वीकारण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.