शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

‘हॅलो चांदा’चा अधिकाधिक वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 10:28 PM

ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी या दूरच्या गावापासून जिवती तालुक्यातील बाबापूर या टोकाच्या गावापर्यंत, चंद्रपूर महानगरापासून चिचपल्ली ग्रामपंचायतपर्यंत, जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेही काही तक्रारी असेल, त्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा अर्थात 'हॅलो चांदा 'ची सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी या दूरच्या गावापासून जिवती तालुक्यातील बाबापूर या टोकाच्या गावापर्यंत, चंद्रपूर महानगरापासून चिचपल्ली ग्रामपंचायतपर्यंत, जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेही काही तक्रारी असेल, त्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा अर्थात 'हॅलो चांदा 'ची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र याचा वापर जोपर्यंत सामान्य नागरिक आपल्या मोबाईलमार्फत करणार नाही, तोपर्यंत ही योजना सक्षम होणार नाही, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग, वनविभाग, पंचायत समिती, नगरपंचायती, ग्रामपंचायत यासह शेताच्या मोजणीपासून तर तहसील कार्यालयातील कोणत्याही कामापर्यंत सामान्य नागरिकांची अडवणूक होत असेल, तर त्यासाठी ‘हॅलो चांदा’ ही नवी यंत्रणा संपूर्ण देशात पहिल्यांदा चंद्रपूरमध्ये सुरू झाली आहे. १५५३९८ हा साधा सहा अक्षरी क्रमांक डायल करून सकाळी १० ते ५ या कार्यालयीन वेळेत आपली तक्रार नोंदवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.गेल्या वर्षी सहा हजार लोकांनी या यंत्रणेचा लाभ घेतला. या माध्यमातून शाळा समितीपासून अंगणवाडी सेविकापर्यंत आणि भूमिअभिलेख कार्यालयापासून सातबारा मिळण्याच्या सेतू केंद्राच्या समस्यांपर्यंत अनेक समस्यांची सोडवणूक करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बिलापासून तर महानगरपालिकेच्या कर वसुली विभागापर्यंत अनेक तक्रारी सोडविण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या यंत्रणेची दखल राज्य आणि देशपातळीवर घेण्यात आली आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.