शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

कोदेपारात एसआरटी धान रोवणीची पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 9:47 PM

उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमशागतीच्या खर्चात बचत : महिला शेतकऱ्याचे धाडस

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.शशिकला माटे या नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. त्यांच्याकडे सात एकर धानाची शेती आहे. आजपर्यंत पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत होत्या. काहीतरी नवीन करावे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकरात धानाची रोवणी केली. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील वर्षी पूर्ण सातही एकरात याच पद्धतीने धानाची रोवणी करणार आहेत. या तंत्राविषयी म्हणाल्या, हे तंत्र कोकणात विकसित झाले आहे. एस.आर.टी तंत्र हे भातशेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करून उत्तम भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे. यामुळे मशागत, बियाणे, मजुरी आदी खर्चात बचत होऊन उत्पादन आणि जमिनीच्या सुपिकतेमध्येही वाढ होते. या तंत्रात शेतीची मशागत व गादीवाफे एकदाच करायचे आणि मग या कायमस्वरूपी या गादीवाफ्यांवर एका मागून एक अशी फेरपालट पिके घेता येतात. या तंत्राचे अनेक फायदे आहेत. चिखलणी व लावणी न करायला लागल्यामुळे ३०-४० टक्के खर्च आणि ५० टक्के त्रास कमी होतो. चिखलणी करताना वाहून जाणाºया सुपीक मातीची धूप वाचेल व पुढच्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देता येईल. गांडुळांची संख्या वाढते. रोपांमधील योग्य अंतरामुळे हवा खेळती राहते.गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत राहते. गादी वाफ्यामुळे कमी पावसात पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. अती पावसात शेतात पाणी साचून राहत नाही. गादीवाफ्यावर भातपिकानंतर नांगरणी न करता फेरपालटीची पिके घेता येतात. दोन पिकांमधील मशागतीचा वेळ आणि खर्च वाचतो. एकदाच केलेले हे गादीवाफे ८-९ वर्ष वापरता येतात. हे तंत्र सर्वसामान्य शेतकºया आत्मविश्वास आणि शेतकºयांना खºया अर्थाने बलवान करणारं ठरू शकते. हे तंत्र यशस्वी झाले तर त्यातून अनेक शेतकºयांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळू शकते, असेही माटे यांनी सांगितले.