शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

झाडीतील हजारो मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; मजुरांचे जत्थे नागपूर, वर्धा, वाशिमकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:26 PM

Chandrapur : विधानसभेच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : पुरेसे काम उपलब्ध नसल्याने झाडीपट्टीतील मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दिवाळीसाठी हे मजूर गावाकडे येत असले, तरी दिवाळीनंतर पुन्हा कामावर जात असल्याने यावर्षीच्या विधानसभेच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पूर्व विदर्भात नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होत असला, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही या तालुक्यांना झाडीपट्टी म्हणून संबोधण्यात येते. झाडीपट्टीतील मुख्य आणि एकमेव पीक धानाचे असून, याच एका पिकावर झाडीपट्टीची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. मात्र, हे धान पीक झाडीपट्टीतील मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने झाडीपट्टीतील मजूर दरवर्षीच रोजगारासाठी चापळीत म्हणजे नागपूर जिल्ह्यात स्थलांतर करीत असतात. काही मजुरांचे जत्थे तर वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत जातात, अशी माहिती आहे. 

उलट वरील जिल्ह्यात बहुपीक पद्धती रूढ आहे. या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मिरची, धान यांसारखे विविध पीक घेतले जातात. मात्र, तेथे उपलब्ध असलेल्या पीक व शेतीनुसार मजूर उपलब्ध होत नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षीच झाडीतील मजुरांना कामासाठी बोलवत असतात. 

सध्या सोयाबीन काढण्याचे काम सुरू झाले. सोयाबीन सवंगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याने अनेक मोठे शेतकरी ओळखीच्या मजुरांकडे निरोप देऊन गेले. या निरोपांवरून नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील शेकडो मजूर उमरेड, भिवापूर तालुक्यात सोयाबीन सवंगण्यासाठी रवाना झाले आहेत. कापूस आणि मिरचीचा हंगाम सुरू झाला की, असेच मजूर या हंगामासाठी नेहमीच जात असल्याचे दिसून येते. 

वाहनांचीही सोय ज्या मजुरांना मुक्कामी राहणे शक्य नाही, अशा मजुरांसाठी वाहनांचीही सोय करण्यात येत आहे. हे मजूर या वाहनांनी ये-जा करीत आहेत. काही गावांत, तर मजुरांची ने-आण करणारी वाहनेच तयार झाली हे शक्यतो भिवापूर, उमरेड तालुक्यापर्यंत मजुरीसाठी जात असतात.

मतदानावर पडणार फरक रोजगारासाठी स्थलांतर केलेले हे मजूर दिवाळीसाठी घरी येत असतात. मात्र दिवाळी झाली की, पुन्हा त्यांचे स्थलांतर सुरु होते. यावेळी स्थलांतराची गती थोडी अधिक असते, जे आहेत, तेही शतकारी स्वतःच्या अलापधारका आज ही रोजगारासाठी स्थलांतर करीत असतात.

अपघात होतात तरीही... मजुरांची ने ने-आण करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात झाले आहेत. सात महिन्यांपूर्वी उमरेड तालुक्यात झालेल्या अपघातात ब्रह्मपुरी तालुक्यातील माहेर येथील ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला होता, तर याच आठवड्यात नागभीड तालुक्यातील डोंगरगाव येथील एक महिला ठार, तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. अशा घटना डोळ्यादेखत घडूनही पोटाची खळगी भरण्यासाठी अशी जोखीम पत्करावी लागत आहे.

टॅग्स :Migrationस्थलांतरणchandrapur-acचंद्रपूर