शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

महिलांच्या आरोग्यासाठी झटणार मिनी मंत्रालय

By admin | Published: October 04, 2015 1:43 AM

चंद्रपूर : घरातील महिला सुरक्षित असेल, तिचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब सुखी व सुरक्षित राहू शकेल. महिलांचे आरोग्य चांगले राहावे,...

चंद्रपूर : घरातील महिला सुरक्षित असेल, तिचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब सुखी व सुरक्षित राहू शकेल. महिलांचे आरोग्य चांगले राहावे, ग्रामीण भागातील तळागाळात राहणाऱ्या महिलांना सर्व सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी मिनी मंत्रालय गंभीर झाले आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील गावागावात विविध उपक्रम राबविले जाणार आहे. या उपक्रमाला महिला अस्मिता पर्व असे नावही मिनी मंत्रालयाने दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व साधारणपणे ग्रामीण जनतेने महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रभावी कृती करणे अपेक्षित आहे. त्यांची अस्मिता जपणे हे आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या हक्कांच्या स्वच्छता सुविधा निर्माण करून देणे महत्त्वाचे आहे. यास्तव अथक परिश्रमांची व अव्याहत चालणारी मोहिमच आवश्यक आहे. या मोहिमेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माता भगिनी या महत्त्वाचा घटक आहेत. त्यांची सुरक्षितता व आरोग्य सर्वांसाठी महत्त्वाची बाब आहे. आणि ही बाब लोकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनजागृतीतून पटवून देण्यात येणार आहे.केंद्र शासनातर्फे गाव हागणदारी मुक्त करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविली जात आहे. गावागावात रस्त्यांवर शौचास कुणीही बसू नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे. महिलांची होणारी कुचंबना दूर व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. मात्र या मोहिमेचा पाहिजे तसा परिणाम अजूनही ग्रामीण भागात दिसून येत नाही. यामुळे महिलांना होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही पोटाचे विकार प्रत्येक ग्रामीण स्त्रीला होत आहेत. घरातील प्रत्येकाने आपल्या घरच्या स्त्रीचा विचार करून घरात एक वस्तु कमी खरेदी करावी. पण घरा-घरात शौचालय बांधकाम झालेच पाहिजे. याकरिता जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. हे महिला अस्मिता पर्व २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबविले जाणार आहे. या कालावधीत विविध उपक्रम राबवून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१५-१६ मधील २३२ ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती केली जाणार आहे. गावातील ग्रामस्थांचा सक्रीय लोकसहभाग मिळविणे, हाही प्रमुख उद्देश असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून आखणी करण्यात आली आहे.या कालावधीत जनजागृतीपर विविध उपक्रमांसोबतच विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. या महिला अस्मिता पर्वासाठी खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ज्ञ यांनी चांगलीच कंबर कसली आहे. (शहर प्रतिनिधी)गावागावांत असे राबविणार उपक्रमग्रामपंचायतीकरिता संपर्क अधिकारी नेमणूक करणे, १९ नोव्हेंबर रोजी जाहीर करावयाची ओडीएफ गावांची निवड, पंचायत समिती स्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक संपर्क अधिकार यांची कार्यशाळा, हागणदारी मुक्त निर्मूलन कृती आराखडा तयार करणे, नादुरुस्त व वापरात नसलेल्या शौचालय धारक कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, दिपावली भाऊबीज भेट कार्यक्रम, सदर कालावधीत गाव हागणदारी मुक्त होतील अशा ग्रामपंचायतींचा पंचायत समिती स्तरावरील सार्वजनिक कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात येईल. हागणदारी मुक्त गावाचे फलक लावण्यात येतील, असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.