शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
2
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
3
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
4
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
5
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
6
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
7
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
8
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
9
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
10
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
11
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
12
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
13
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
14
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
15
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
16
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
17
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
18
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
19
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
20
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?

नागभीड पोलिस ठाण्याला बदल्यांचे ग्रहण केवळ; वरिष्ठ प्रशासनास झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 2:14 PM

Chandrapur : वर्षभरात तीन ठाणेदारांच्या बदल्या

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : एका ठिकाणी नियुक्ती दिलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची तीन वर्षे बदली करू नये, असे संकेत आहेत. मात्र, नागभीड येथील ठाणेदारांच्या बदल्यांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास हे संकेत पायदळी तुडविल्याचे लक्षात येते.

नागभीड येथे एका वर्षात चक्क तीन ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत आणि चौथ्या ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या पाहिल्या तर बदल्यांचे अधिकार असलेल्या वरिष्ठ प्रशासनास झाले तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

२०२३ च्या दुसऱ्या चरणात नागभीड पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी योगेश घारे यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच ठाणेदार योगेश घारे यांनी या ठाण्यावर चांगली पकड निर्माण केली आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले. घारे यांनी सुरू केलेली "सायरन गस्त" काहींच्या टीकेचा विषय ठरली होती. मात्र, या सायरन गस्तीमुळे शहरातील चोऱ्यांचे प्रमाण नक्कीच कमी झाले होते.

मात्र, अचानक २८ जानेवारी २०२४ रोजी योगेश घारे यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले आणि नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून विजय राठोड यांना नियुक्त करण्यात आले. ते येथे स्थिरस्थावर होत असतानाच अवघ्या सहा महिन्यांत ठाणेदार विजय राठोड यांचे ६ ऑगस्ट २०२४ रोजी स्थानांतरण करण्यात आले आणि अमोल काचोरे यांची नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल काचोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने काचोरे यांची आता निदान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी बदली होणार नाही, असेच वाटत होते. मात्र, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अवघ्या दोन महिन्यांत ५ ऑक्टोबर २०२४ रोजी ठाणेदार अमोल काचोरे यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले. आता नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून रमाकांत कोकाटे यांनी तत्काळ प्रभावाने ६ ऑक्टोबर २०२४ रोजी नागभीडचे नवीन ठाणेदार म्हणून प्रभार स्वीकारला आहे. 

तीन वर्षे तरी बदली करू नये येथील ठाणेदारांच्या पदाला लागलेले बदल्यांचे ग्रहण लक्षात घेता, हे ग्रहण येथेच संपून आणि कोकाटे यांनी पूर्ण तीन वर्षे नागभीडच्या ठाणेदारपदी कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किमान तीन वर्षे तरी ठाणेदारांची बदली करू नये, अशी शहरवासीयांची मागणी आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर