शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

नहराला भगदाड, पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:38 PM

पिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा व शेतकरी राजा सुखी समृद्ध व्हावा, या हेतूने शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजवा कालव्याद्वारे शेकडो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जाते. परंतु, कंत्राटदाराने उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाऱ्या पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे कालव्याच्या पाळीला मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके करपत असलेले चित्र ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द येथे बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देपिके करपली : गोसेखुर्दच्या छोट्या कालव्यांची स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा व शेतकरी राजा सुखी समृद्ध व्हावा, या हेतूने शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजवा कालव्याद्वारे शेकडो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जाते. परंतु, कंत्राटदाराने उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाऱ्या पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे कालव्याच्या पाळीला मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके करपत असलेले चित्र ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द येथे बघायला मिळत आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात सद्या शेतीचा हंगाम जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात धान पिकांची लागवड केली आहे. पिकासाठी पाणी सोडल्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल, अशा आशेत बळीराजा होता. मात्र उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाºया पाईपलाईनचे काम करताना कंत्राटदाराने सिमेंट काँक्रीटचा वापर न करता केवळ मुरूम टाकून काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे पावसाच्या पाण्याने उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवरील मुरुम खचल्याने पाळीला मोठे भगदाड पडले आहे.उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवरील मुरुम पाईपलाईनमध्ये गेल्यामुळे शेतीला छोट्या कालव्यामार्फत होणाºया पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे भात पीक करपत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बी-बियाणांचा खर्च डोळ्या देखत वाया जात आहे. शेतकरी हवालदिल झाला असून कर्जाच्या खाईत जाणार असल्याचे चित्र सद्या स्थितीवरुन दिसत आहे.नहराच्या पाळीला मोठे भगदाड पडल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देऊन छोट्या कालव्याद्वारे बंद झालेला पाणी पुरवठा त्वरीत सुरू करण्यात यावा अशी मागणी तोरगाव खुर्द येथील शेतकरी विनय पारधी, श्रीकृष्ण पारधी, नामदेव बुल्ले, जयघोष बुल्ले, मधुकर बुल्ले, गुलाब बनकर, आत्माराम बुल्ले, करबा सुखदेवे, गुरुदेव पारधी, प्रकाश बावनकुळे यांनी केली आहे.