शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

नाला डायवरशनमुळे ३५० एकर शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:31 AM

राजुरा : राजुरा तालुक्यातील गोवरी, चिंचोली, माथरा या गावांजवळून वाहणाऱ्या ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून त्यांना एकाच ओढ्यात प्रवाहित ...

राजुरा : राजुरा तालुक्यातील गोवरी, चिंचोली, माथरा या गावांजवळून वाहणाऱ्या ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून त्यांना एकाच ओढ्यात प्रवाहित केल्याने आणि खाणीभोवती माती टाकून उंच भाग केल्याने या नाल्यातील संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन सुमारे ३५० एकर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र आश्वासन देऊनही वेकोलिने कसलीही नुकसानभरपाई दिली नाही. ओढा डायवरशन करताना वेकोलिने कायदाभंग केला असून, वेकोलिच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गोवरी, पोवनी व माथरा येथील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रपरिषदेत केली.

या शेतकऱ्यांनी राजुरा तहसीलदार यांना निवेदन देऊन या भागातील चार मोठ्या ओढ्यांचे वळणीकरण करताना वेकोलिने कायदयातील तरतुदीचे उल्लंघन करून खोदकाम केले, असा आरोप केला आहे. गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली या गावांच्या परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाण परिसरात अनेक नाले आहेत. वेकोलिने यापूर्वी दोन ओढ्यांचे खोदकाम करून नैसर्गिकपणे वाहणाऱ्या नाल्यांना कृत्रिमपणे गोवरी ओढ्याला जोडले. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून बॅकवॉटरचा फटका गोवरी व परिसरातील गावांना व शेतीला बसत आहे. २२ व २३ जुलैला गोवरी गावातील अनेक घरांत पाणी घुसून गावकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच गोवरी परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतपिकाचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र वेकोलिकडून नुकसानभरपाई देण्यात आली नाही.

पत्रकार परिषदेला ॲड. मारोती कुरवटकर आणि गोवरी येथील शंकर बोढे, सुधाकर पाचभाई, किशोर लोहे, रूपेश पाचभाई, अरुण पाचभाई, विलास लोहे, सुधाकर ढुमने, श्रीरंग उरकुडे, गुरुदास अहीरकर, लहू चहारे, सुनील पाचभाई, पंढरी बोढे व शेतकरी उपस्थित होते.

190821\img-20210818-wa0241.jpg

फोटो