शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

वन्यजीवांसाठी नंदोरी- कोंढा फाटा ठरला कर्दनकाळ; अपघाती मृत्यूसत्र सुरूच

By राजेश मडावी | Updated: September 2, 2023 14:44 IST

प्रशासनाचे उपशमन योजनेकडे दुर्लक्ष

चंद्रपूर :चंद्रपूर-नागपूर महामार्गावर नंदोरी जवळ कोंढा फाट्यावर शनिवारी (दि. २) एकाच दिवशी दोन रानमांजराचा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी रानमांजर मृतावस्थेत आढळली. शुक्रवारी सात फूटांचा अजगराचाही बळी गेला. मार्ग तयार करताना वन्यजीवांचा विचार झाला नाही. त्यामुळे रस्ते अपघातात यापूर्वी बिबट, निलगाई, तडस, कोल्हा, रानटी डुक्कर व अनेक सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडले, असा आरोप हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे सदस्य गणेश पिदूरकर यांनी केला.

चंद्रपूर-नागपूर महामार्गालगत वरोरा- भद्रावती वनपरिक्षेत्राचे जंगल असल्याने वन्यप्राण्यांची मोठी विपूलता आहे. रानमांजरांची संख्या तर बरीच मोठी आहे. वाघ, बिबट व अन्य  वन्यप्राणी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील नंदोरी जवळूनच नेहमी रस्ता ओलांडतात. वन्यजीवांसाठी अजूनही महामार्ग प्रशासन किंवा वनविभागाने उपशमन योजनेची अंमलबजावणी केली नाही. रस्ता बांधताना वन्यप्राण्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देणे हा उपशमनाचा हेतू आहे. पण, शासन व बांधकाम करणाऱ्या कंपनीने दुर्लक्ष केल्याने वन्यप्राण्यांचे अपघातात बळी जात आहे, असेही हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे सदस्य गणेश पिदूरकर यांनी नमुद केले आहे.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूरwildlifeवन्यजीव