शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

हजारो हेक्टर शेतीवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:02 PM

शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी पिके करपली : पाऊस झाला बेपत्ता

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.खरीप हंगामाच्या सुरुवतीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पावसमाुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असतानाच ऐन वेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली आहे. सध्या पिकांच्या फळधारणेचा काळ आहे. परंतु गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने पिकांना मोठा फटका बसला असून कापसाचे पीक करपायला लागले आहे. विदर्भ प्रांत कापूस पिकांसाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकºयांनी शेती केली आहे. परंतु निसर्गाने ऐनवेळी खरिपाच्या पिकांना दगा दिला आहे. कपासीवर यावर्षी बोंडअळीचे सावट घोंगावत असताना अचानक पावसाने पाठ फिरविल्याने फळधारणेवर आलेली पिके करपायला लागली आहे. यावर्षी कपाशीला विविध रोगांनी ग्रासल्याने शेतकºयांनी पिकावर अतोनात खर्च केला आहे. मात्र परतीचा पाऊसही अचानक बेपत्ता झाल्याने खरिपातील पिकांचे आता कसे होणार, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलावा आटून गेल्याने जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. आज उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु पाऊस येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पाऊस आला नाही तर यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. एकूणच शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे.एका बॅगला तीन पोते सोयाबीनची उतारीसोयाबीनचा दाना भरण्यासाठी पावसाची गरज आहे. मात्र पाऊस आला नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना भरला नाही. पोकळ शेंगा लागल्या. शेतकºयांनी सोयाबीनवर खर्च केला. आता सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून एका बॅगला तीन पोते सोयाबीन उतारी मिळत असल्याने केलेला खर्च निघणार कसा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.पावसाअभावी शेतातील पिके वाळायला लागली आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट होणर असून शेतीवर केलेला खर्च भरुन निघेल की नाही, याची हमी शेतकऱ्यांजवळ नसल्याने शेतकरी आताच हतबल झाला आहे.-गणेश पाटील, शेतकरी भोयेगाव