शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

शासनाची भागीदारी जमा होईपर्यंत पीक विमा नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:30 AM

घनश्याम नवघडे नागभीड : पीक विमा कंपन्यांनी नागभीड तालुक्यासाठी पीक विम्यापोटी एक कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये ...

घनश्याम नवघडे

नागभीड : पीक विमा कंपन्यांनी नागभीड तालुक्यासाठी पीक विम्यापोटी एक कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये जून महिन्यातच मंजूर केले आहेत. मात्र, पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. जोपर्यंत शासन आपली भागीदारी विमा कंपन्यांकडे जमा करीत नाही, तोपर्यंत विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे.

नागभीड तालुक्यात आठ हजार ५८८ शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी आहेत. आणि हेक्टरी एक हजार १७६ रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. मागील वर्षीच्या हंगामात अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत केले. प्रत्येक गावातील जाहीर करण्यात आलेली शासकीय पैसेवारीही ५० टक्क्यांच्या आत होती. म्हणूनच शेतकऱ्यांकडून पीक विम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर दबाव वाढल्यांनतर विमा कंपन्यांनी ही मागणी मान्य करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याइतकी का होईना,पण पीक विमा देण्याचे जाहीर करून जून महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करून तालुक्यातील ८ हजार ५८८ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रूपये मंजूर केले. एवढेच नाही तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या तशा याद्याही संबंधित कृषी कार्यालयांना रवाना करण्यात आल्या.

दरम्यान, काही जाणकार शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून या वेळकाढूपणाबद्दल विचारणा केली. तालुका कृषी कार्यालयाने यासंदर्भात संबंधित विमा कंपनीकडे चौकशी केली असता आम्ही शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम देण्यास तयार आहोत. पण शासनाकडून भागीदारीची रक्कम प्राप्त झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम टाकण्यास अडचण येत असल्याची माहिती या पीक विमा कंपनीकडून तालुका कृषी कार्यालयास देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. हा संदर्भ घेऊन प्रस्तुत प्रतिनिधीने येथील तालुका कृषी कार्यालयास विचारणा केली असता या कार्यालयाकडून या बाबीस दुजोरा देण्यात आला.

बॉक्स

तीन महिने लोटले; मात्र विम्याचे पैसे मिळाले नाहीत

या बाबीस आता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी होत असला तरी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली नाही. यामुळे शेतकरी वर्गात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. सध्या पिकाच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना एक एक रुपयाची गरज आहे. पैशाअभावी शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक विमा कंपन्यांना नाही.