शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करता येणार ६० दिवसांआधी, तिकिटांचा काळाबाजार वाढण्याची भीती !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 2:03 PM

Chandrapur : प्रवशांनी व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने आरक्षणासाठीचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणून प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० दिवस आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविषयी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे आरक्षित तिकीट आताच मिळत नाही तर ६० दिवसांच्या निर्णयामुळे आणखी "वेटिंग" वाढेल. यातून आणखी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार फोफावणार आहे. 

रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन खूप अगोदर करणे शक्य होते. त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षित करणे सोयीचे होते; परंतु नव्या निर्णयानुसार ६० दिवसांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे तिकीट बुकिंगसाठी झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे ६० दिवसातच करावे लागेल. ऐन दिवाळीच्या हंगामात घेतलेला निर्णय हा प्रवाशांना फटका देणारा असून रेल्वे प्रशासनाने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

१२० दिवसच कायम राहावा "रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवसच कायम राहावा."- जयकरणसिंग बजगोती, माजी डीआर यूसीसी सदस्य, बल्लारपूर.

"हा निर्णय चुकीचाच ६० दिवसानंतर कुठे जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हॉटेल आदींचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास ढकलावा लागेल. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण पूर्वीचेच ठेवावे." - अतुल भांबोरे, जनाधार अधिवक्ता संघ

"तारखेनुसार नियोजन ज्या तारखेनुसार जायचे असेल, त्यानुसार तिकिटाचे नियोजन करावे लागेल. याचा त्रास पर्यटनाला जाणाऱ्यांना होणार, यामुळे वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम ठेवावा."- विवेक खुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर.

टॅग्स :railwayरेल्वेchandrapur-acचंद्रपूर