शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरुच; भाड्यात दुप्पट-तिप्पट दराने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 18:16 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांकडून वारेमाप शुल्क आकारले जात आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद भाडे १७००, प्रवाशांची लूट पर्यायच नसल्याने प्रवाशांकडून खासगी वाहनांचा वापर

चंद्रपूर : शासनात विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. प्रवासाची साधने कमी असल्याने ट्रॅव्हल्सधारक मनमानी भाडे वसूल करीत आहेत. चंद्रपूर ते औरंगाबादचे भाडे तर १७०० रुपये आकारत आहेत. मात्र पर्याय नसल्याने अतिरिक्त भाडे देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

मागील दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत आहेत. ट्रॅव्हल्स तर खचाखच भरून धावत आहेत. तसेच त्यांनी भाडेवाढसुद्धा केली आहे.

चंद्रपुरातून पुणे, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, राजुरा आदी मार्गावर ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावत आहेत. त्यातच कोरोनाने रेल्वेही अल्प प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नाही. परिणामी ट्रॅव्हल्सची प्रत्येक फेरी खचाखच भरून धावते. तपासणीही होत नसल्याने वारेमाप शुल्क आकारले जात आहे.

ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी

प्रवाशांची हेडसांड होऊ नये वाहतूक विभागातर्फे व आरटीओतर्फे स्कूल बसेस, खासगी वाहनांना परवानगी दिली आहे. तपासणीसाठी पोलिसांचे पथकही गठित केले आहे. तसेच निरीक्षकही नेमण्यात आले आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याने ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे.

ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या क्षमतेपेक्षा अधिक सीट भरल्या, तर आरटीओचे किंवा वाहतूक विभागाचे पथक कारवाई करीत होते. मात्र संप सुरू असल्याने पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे की काय, असे दिसून येत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे. ते अतिरिक्त शुल्क आकारत आहेत.

पैसे जास्त देण्याशिवाय पर्याय काय?

ट्रेनही बंद आहे. बससुद्धा नाही. परंतु, कामानिमित्त प्रवास करावाच लागतो. त्यामुळे इच्छा नसूनही, पर्याय नाही म्हणून अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.

- अमित दुधे, प्रवासी

चंद्रपूर ते गडचिरोली जाण्यासाठी बसने केवळ ९० रुपये लागायचे. परंतु, ट्रॅव्हल्सने १०० रुपये द्यावे लागतात. तेसुद्धा ट्रॅव्हल्स व्याहाडपर्यंत जात असते. पर्याय नसल्याने प्रवास करावाच लागतो.

- धम्मदीप बोरकर, प्रवासी

टॅग्स :ST Strikeएसटी संपagitationआंदोलनpassengerप्रवासीPublic Transportसार्वजनिक वाहतूकticketतिकिट