शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

बाजाराच्या मागणीनुसार वस्तुंची निर्मिती करा

By admin | Published: March 03, 2017 12:49 AM

महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. अलीकडे कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक क्रांती घडवित आहेत.

मुनगंटीवार यांचा बचतगटांना सल्ला : सरस महोत्सव स्वयंसिध्दा - २०१७चंद्रपूर : महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. अलीकडे कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक क्रांती घडवित आहेत. विविध उत्पादने गटाच्या माध्यमातून महिला घेत आहेत. या गटांनी आता पारंपारिक उत्पादनांना बाजूला सारत बाजारात चांगली मागणी असलेल्या वस्तूंच्या निर्मितीकडे वळले पाहिजे, असा सल्ला राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.ग्रामीण विकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर तसेच जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोलीच्या वतीने आयोजित महिला स्वयंसहायता गटामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीकरिता विभागीयस्तरीय सरस महोत्सव स्वयंसिध्दा २०१७ च्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.नाना शामकुळे, आ.बाळू धानोरकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती ईश्वर मेश्राम, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, गोंदीयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पलकुंडवार, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, वर्धाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उपविभागीय अधिकारी आर.दयानिधी, एस.राममूर्ती, विपीन इटनकर, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी अमन मित्तल, विकास उपायुक्त विपुल जाधव आदी उपस्थित होते.बचतगटांच्या वस्तुला अलिकडे प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. एका आॅनलाईन कंपनीने बचतगटाच्या वस्तु आॅनलाईन विक्रीसाठी ठेवल्या असता त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे आढळून आले. गटांनी आता पारंपारिक वस्तुंना बाजूला करून बाजाराच्या मागणीप्रमाणे वस्तुंची निर्मिती करावी, तसेच आॅनलाईन विक्रीवर भर द्यावा, असे मुनगंटीवार म्हणाले. महिला बचतगटांनी रोजगार देणारे बनावे, असेही ते म्हणाले.बांगलादेशाने महिला बचतगटाच्या माध्यमातून क्रांती केली आहे. अशीच क्रांती आपणही करू शकतो. विविध क्षेत्रात महिला पुढे आहे. कौशल्य विकासात महिलांचे प्रमाण ५७ टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी मुलींचे प्रमाण ६८ टक्के आहे. नारी शक्तीचा रोजगार निर्मितीसाठी वापर झाला पाहिजे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी आमदार सुरेश धानोरकर, जि.प.अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, विभागिय आयुक्त अनुपकुमार यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केले.कार्यक्रमाचे आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक सिरसे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)बचतगटांमुळे महिला व्यवहारी झाल्या - हंसराज अहीरबचतगटांमुळे देशातील महिलांमध्ये आर्थिक क्रांती घडून आली. ग्रामीण महिलांना आर्थिक व्यवहार समजले. त्या व्यवहारी झाल्या, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. बचतगटाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणात महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. प्रयत्न, परिश्रम आणि इच्छाशक्तीतून बदल घडविता येऊ शकतो, हे राज्यातील महिलांनी दाखवून दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात कौशल्याला फार महत्व आहे. गटाच्या महिलांनी कौशल्य प्राप्त करून विविध वस्तुंचे दर्जेदार उत्पादन करावे आणि चांगली बाजारपेठ मिळवावी, यासाठी शासनसुध्दा सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण, दर्जा आणि गुणवत्तेच्या बळावर गटाची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात जातील, असेही त्यांनी सांगितले. महिला गटांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे, असेही ना. अहीर म्हणाले.३० हजार कुटुंबांना रोजगारजिल्ह्यात महिलांचे १२ हजार गट अस्तित्वात आहे. ३० हजार कुटुंबांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष गटाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी दिली. नागपूर विभागातील २२६ महिला गटांनी प्रदर्शनी व विक्री महोत्सवात सहभाग घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाहुण्यांनी काही गटांच्या विक्री स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. तसेच गटाच्या महिलांशी संवाद साधला. सदर प्रदर्शनात महिलांनी निर्मित केलेल्या विविध वस्तु ठेवण्यात आल्या आहे. प्रदर्शन ६ मार्चपर्यंत चालणार असून चंद्रपूरकरांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.