शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

‘अच्छे दिन’ चे आश्वासन हवेत विरले; बल्लारपुरात शिवराज्य यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 15:35 IST

भाजप सरकारने दिलेले ‘अच्छे दिन’ चे आश्वासन हवेत विरले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या व बेरोजगारीत वाढ होत असून दबावतंत्राने हुकूमशाही सुरू झाली आहे. चुकीच्या नियोजनाने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. महसूल वाढावा म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख असलेले गडकिल्ले लग्नादी कार्याकरिता किरायाने देण्याचा शासनाने घाट रचना आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यायाने राज्याच्या वैभवशाली इतिहासचा अपमान असून भाजप सरकारने दिलेले ‘अच्छे दिन’ चे आश्वासन हवेत विरले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे सोमवारी सायंकाळी बल्लारपुरात आगमन झाल्यानंतर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर मंचावर राजेंद्र वैद्य, राकाँच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकनकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, माजी मंत्री अनिल देशमुख, बाबासाहेब वासाडे, दीपक जयस्वाल, विधान सभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेंभूर्डे, सूरज चव्हाण, मेहबूब शेख, डी. के आरीकर, सुरेश रामगुंडे, हिराचंद बोरकुटे, कुतुबुद्दीन सिद्दी आदींची उपस्थित होती. खासदार कोल्हे यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केला. शिवसेना व भाजपच्या महाजनादेश यात्रेपेक्षा शिवस्वराज्य यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, काही नेते राकाँ सोडून गेल्याने काही फरक पडणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून राकाँ दोन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र वैद्य यांनी केले. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आजी - माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी