शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

समाजाच्या विकासासाठी परिचय मेळावे योग्य व्यासपीठ

By admin | Published: January 15, 2016 1:44 AM

सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी परिचय मेळाव्यासारखे उपक्रम आवश्यक असून या माध्यमातून समाज एकत्र घेऊन समाजाचा विकास होण्यास मदत होते.

शांताराम पोटदुखे : तेली समाज उपवर- वधू परिचय मेळावाचंद्रपूर : सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी परिचय मेळाव्यासारखे उपक्रम आवश्यक असून या माध्यमातून समाज एकत्र घेऊन समाजाचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे परिचय मेळावे समाजाच्या विकासासाठी चांगले व्यासपीठ ठरत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले. तेली युवक मंडळ चंद्रपूरच्या वतीने मातोश्री सभागृह तुकूम येथे आयोजित उपवर-वधू परिचय मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवराव बालपांडे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे, मेडिकल कॉलेजचे अधिव्याख्याता डॉ. चारुहास आखरे, डॉ. चेतन उराडे, सुनील बन्सोड, शोभा पोटदुखे, प्रा. वासुदेव रागीट, माजी नगरसेवक रावजीे चवरे, बबनराव फंड, नरेंद्र बुरांडे, राजेंद्र आखरे, शंंकर उराडे, चंद्रशेखर घटे, अनिल खनके, महेश बारई, पाडूरंग चन्ने, सुमन उमाटे, नगरसेवक आकाश साखरकर, योगेश समरित, देवेंद्र बेले, मनोहर बेले, रमेश भुते, प्रा. मधूकर रागीट, रेखा वैरागडे, राजू रघाताटे, प्रमोद हजारे, शैलेश जुमडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.पुढे बोलताना पोटदुखे म्हणाले, उपवर- वधूंचे लग्न जुळविताना कुटुंबीयांना मोठी कसरत करावी लागते. वेळ, पैसा खर्च होतो. परंतु परिचय मेळाव्यापासून उपवर- वधू त्यांच्या पसंतीचे ठिकाण एकाच ठिकाणी बघायला मिळते. शिवाय संपूर्ण समाजबांधव एकत्र येत असल्याने त्यांच्यात एकीचे बळ दिसून येते. त्यामुळे असे उपक्रम वारंवार व्हावेत, असे ते म्हणाले.यावेळी अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान कार्यक्रमात समाजातील उपवर- वधूंची माहिती असलेल्या ‘प्रेरणा-१६’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मेळाव्यात २०० हून अधिक उपवर- वधूंनी परिचय दिला. कार्यक्रमात मुख्याध्यापक शंकर उराडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बंडू बिजवे यांनी केले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी केले. (शहर प्रतिनिधी)