शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
2
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
3
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
4
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
5
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
6
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
7
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
8
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
9
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
10
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
11
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
12
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
13
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
14
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
15
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
16
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
17
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
18
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
19
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट

गावकऱ्यांचा ठिय्या; तरीही पाणीपुरवठा नाहीच; विसापूर ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 2:59 PM

Chandrapur : पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ग्रामपंचायतीने दिले लेखी आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : पाण्याची कोणतीही कृत्रिम टंचाई नसताना विसापूर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनापायी मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही विसापूर गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. त्यामुळे मुबलक पाऊस पडूनही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे

याबाबत ठोस उपाययोजना न केल्यामुळे 'लोकमत'ने यापूर्वी गावकऱ्यांचा संयमाचा बांध कधीही फुटून ते मोर्चा काढून संबंधितांना धारेवर धरू शकतात, असे भाकीत केले होते. ते अखेर खरे ठरले व गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी संदीप पोडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी मोर्चा काढून ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन केले. अखेर ग्रामपंचायतीकडून ग्रामसचिव किशोर धकाते यांनी लेखी आश्वासन देत २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, यापूर्वीही दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते. पण अजूनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे आतातरी गावकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनमुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील पंप हाऊसची इंटक मोटार ही फार जुनी असून, तिचे आयुष्य संपले आहे. ती नवीन घेण्याशिवाय पर्याय नाही, याची माहिती ग्रामपंचायतीत नवीन सत्ता बसली तेव्हाच सर्व सदस्यांना माहीत होते. 

यावर ठरावसुद्धा घेण्यात आला. परंतु, नियोजनाअभावी आजतागायत तीच जुनी मोटार वारंवार दुरुस्त करून तिचा वापर सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना नदीला मुबलक पाणी असूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत यापूर्वी 'लोकमत'ने प्रकाश टाकला व गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असे भाकीत केले होते. परंतु, कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे अखेर गुरुवारी गावकऱ्यांनी भाजपा नेते संदीप पोडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला जेरीस आणले. यावेळी सरपंच अनुपस्थित असल्याने उपसरपंच व ग्रामसचिवांना गावकऱ्यांचा रोष पत्करावा लागला. अखेर ग्रामसचिव किशोर धकाते यांनी २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 

ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या विसापुरात मागील एक वर्षापासून ना त्या कारणाने अधूनमधून पाणीपुरवठा बंद पडत आहे. यावेळी दोन महिन्यांपासून योजना ठप्प पडली आहे. कधी वीज कपातीमुळे तर कधी पंप हाऊसची इंटक मोटरच्या बिघाडामुळे नळपाणी पुरवठा बंद असते. ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात