शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

जिल्ह्यात फळबाग लागवडीला देणार चालना

By admin | Published: September 12, 2016 12:44 AM

जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी आता फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

एमआरईजीएसचा लाभ : २०१५-१६मध्ये फळ पिकांखाली १३७ हेक्टर क्षेत्रचंद्रपूर : जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी आता फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कृषी सहायकनिहाय १० हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही लागवड शेतीमध्ये सलग करण्याऐवजी बांधावर, शेततळे आदी जेथे जागा उपलब्ध होईल, तेथे करण्यात येत आहे. २०१५-१६मध्ये १३७ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. यावर्षी एमआरईजीएसमधून ३० नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड केली जाणार आहे.यापूर्वी राज्यात रोजगार हमी योजना कार्यान्वित होती. केंद्र सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करून १०० दिवस रोजगार देण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र शासनाच्या योजनेला जोड देऊन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. त्याअंतर्गत राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनाबादे यांनी कृषी सहायकनिहाय १० हेक्टरमध्ये एमआरईजीएसअंतर्गत फळ झाडे लागवड करण्याचे ठरविले आहे.फळबाग योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यात मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, पेरू, केळी, आंबा, पपई, आवळा, सीताफळ आदींची लागवड करण्यात येत आहे. ही फळ झाडे खासगी रोपवाटिका, किसान नर्सरी आदीमधून रोपे घेऊन करण्यात येत आहे. एमआरईजीएसअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि जॉब कार्डधारक लोकांना फळ झाडे लावण्याचे काम देण्यात येत आहे. त्यानंतर एमआरईजीएसच्या निकषानुसार, वेतन देण्यात येत आहे. रोजंदार मजुरामार्फत काम करण्यात येत असल्याने शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. शासनाकडून रोपांचा पुरवठा करण्यात येतो आणि ते रोपे लावण्याचे काम मजुरांवर सोपविण्यात येते. आधी रोजगगार हमी योजनेत कृषी विभागाची यंत्रणा फळबाग लागवड करीत असे. सलग शेती क्षेत्रात ही लागवड कृषी विभागामार्फत केली जात असे. त्याकरिता १०० अनुदानावर रोपांचा पुरवठा केला जात असे. शेतकऱ्यांना फळबाग विकसित करण्यास सांगण्यात येत असे. एमआरईजीएसमध्ये सलग शेती क्षेत्राची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतीचा बांध, शेततळे आदी जागेवरही ही फळ झाडे लावण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)आंबा, चिकूची लागवडकृषी विभागातर्फे २०१५-१६ मध्ये १३७ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्यात येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३९.५० हेक्टरमध्ये कागदी लिंबाची लागवड करण्यात आली. त्यानंतर आंबा कलमे २७ हेक्टर, पपई १७ हेक्टर, पेरू १७.४० हेक्टर, मोसंबी ४ हेक्टर, चिकू ८ हेक्टर, डाळींब ०.६० हेक्टर, केळी १.५ हेक्टर, आवळा १० हेक्टर आणि सीताफळाची १२ हेक्टरवर लागवड करण्यात येत आहे.३३८६ हेक्टरचे उद्दिष्टमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत एक कृषी सहायकनिहाय १० हेक्टरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात ३३८६.९१ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये आंबा, चिकू, साग, शेवगा, संत्रा आणि कोरववाहू फळांचा समावेश राहणार आहे. ही फळ झाडे मजुरांना वेतन देऊन लावण्यात येणार आहेत. त्याकरिता सलग क्षेत्राची गरज नाही.ईजीएसची प्रतीक्षाजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ६७.७१ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्या प्रस्तावाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. तो प्रस्ताव मंजूर झाल्यास १०० टक्के अनुदानावर रोपांचा पुरवठा करण्यात येईल.