शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

‘सीसीआय'कडून राज्यात फक्त १ लाख कापूस गाठींचीच खरेदी; जाचक अटींचा फटका

By राजेश मडावी | Published: January 20, 2024 5:18 PM

शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदाच नाही

चंद्रपूर : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडून हमीभावाने सर्वाधिक कापूस खरेदी होईल, असे दावे सरकारकडून केले जात होते; मात्र जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रांकडे पाठ फिरवली. त्यामुळे आतापर्यंत ८ जानेवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्रात एक लाख कापूस गाठी खरेदीच्या पुढे सीसीआयला जाता आले नाही. शेतकऱ्यांनी हमीभावाच्या कमी किमतीत सर्वाधिक कापूस विकल्याने सीसीआय राज्यात मागे पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सीसीआयने १६ जानेवारी २०२४ पर्यंत देशभरात २१ लाख २९ हजार गाठींची खरेदी केली. यामध्ये सर्वाधिक खरेदी तेलंगणा राज्यात तेलंगणा सीसीआयने केली. या आठवड्यात त्या राज्यातील शेतकऱ्यांकडून १६ लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. इतर राज्यात केवळ २५ टक्के खरेदी झाली. महाराष्ट्रात फक्त १ लाख गाठी कापूस सीसीआयला खरेदी करता आला. महाराष्ट्रानंतर कापूस उत्पादनात गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असतो; परंतु गुजरातमध्येही सीसीआयची खरेदी केवळ २० हजार गाठींची झाली. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सीसीआयच्या जाचक अटी व शर्तींचा मोठा फटका बसला आहे. या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस हमीभावापेक्षा कमी भावात विकला. सीसीआयने केवळ चार राज्यांमध्ये एक लाख गाठीपेक्षा जास्त कापूस खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे.

कापूस उत्पादन घटूनही भाव कमी

मागील हंगामाच्या तुलनेत यंदा कापसाच्या उत्पादनात सुमारे आठ टक्के घट येण्याचा अंदाज ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’ने (सीएआय) वर्तवला आहे. महाराष्ट्रात हा अंदाज खरा ठरला आहे. गतवर्षी ३११ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा २९४ लाख गाठींपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात कापसाला ६ हजार ८०० ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील महाग कापूस आयात होतो; मात्र येथील शेतकऱ्यांच्या कापसाला जादा दर का मिळू शकत नाही, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.

सीसीआयची आतापर्यंत राज्यनिहाय कापूस खरेदी (गाठीमध्ये)

तेलंगणा १५,८६,१००आंध्र प्रदेश १,१७,१००मध्य प्रदेश १,०३,५००महाराष्ट्र १,०१,८००कर्नाटक ५२,७००ओडिशा ५१,५००पंजाब ३७,४००हरयाणा ३४,९००राजस्थान २३,७००गुजरात २०,७००तामिळनाडू ३००इतर २५०