शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘सीसीआय'कडून राज्यात फक्त १ लाख कापूस गाठींचीच खरेदी; जाचक अटींचा फटका

By राजेश मडावी | Updated: January 20, 2024 17:18 IST

शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदाच नाही

चंद्रपूर : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडून हमीभावाने सर्वाधिक कापूस खरेदी होईल, असे दावे सरकारकडून केले जात होते; मात्र जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रांकडे पाठ फिरवली. त्यामुळे आतापर्यंत ८ जानेवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्रात एक लाख कापूस गाठी खरेदीच्या पुढे सीसीआयला जाता आले नाही. शेतकऱ्यांनी हमीभावाच्या कमी किमतीत सर्वाधिक कापूस विकल्याने सीसीआय राज्यात मागे पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सीसीआयने १६ जानेवारी २०२४ पर्यंत देशभरात २१ लाख २९ हजार गाठींची खरेदी केली. यामध्ये सर्वाधिक खरेदी तेलंगणा राज्यात तेलंगणा सीसीआयने केली. या आठवड्यात त्या राज्यातील शेतकऱ्यांकडून १६ लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. इतर राज्यात केवळ २५ टक्के खरेदी झाली. महाराष्ट्रात फक्त १ लाख गाठी कापूस सीसीआयला खरेदी करता आला. महाराष्ट्रानंतर कापूस उत्पादनात गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असतो; परंतु गुजरातमध्येही सीसीआयची खरेदी केवळ २० हजार गाठींची झाली. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सीसीआयच्या जाचक अटी व शर्तींचा मोठा फटका बसला आहे. या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस हमीभावापेक्षा कमी भावात विकला. सीसीआयने केवळ चार राज्यांमध्ये एक लाख गाठीपेक्षा जास्त कापूस खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे.

कापूस उत्पादन घटूनही भाव कमी

मागील हंगामाच्या तुलनेत यंदा कापसाच्या उत्पादनात सुमारे आठ टक्के घट येण्याचा अंदाज ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’ने (सीएआय) वर्तवला आहे. महाराष्ट्रात हा अंदाज खरा ठरला आहे. गतवर्षी ३११ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा २९४ लाख गाठींपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात कापसाला ६ हजार ८०० ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील महाग कापूस आयात होतो; मात्र येथील शेतकऱ्यांच्या कापसाला जादा दर का मिळू शकत नाही, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.

सीसीआयची आतापर्यंत राज्यनिहाय कापूस खरेदी (गाठीमध्ये)

तेलंगणा १५,८६,१००आंध्र प्रदेश १,१७,१००मध्य प्रदेश १,०३,५००महाराष्ट्र १,०१,८००कर्नाटक ५२,७००ओडिशा ५१,५००पंजाब ३७,४००हरयाणा ३४,९००राजस्थान २३,७००गुजरात २०,७००तामिळनाडू ३००इतर २५०