शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

५० वर्षांनंतर मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 10:31 PM

१९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे.

ठळक मुद्देपुनर्वसित नवानगर येथे वॉटर एटीएम मंजूर : नागरिकांना आरोग्य समस्येपासून मिळणार मुक्ती

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे.नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत नवानगर समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पुनर्वसन काळात ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आता गावाचा विस्तार बराच झाला आहे. आणि गावाची लोकसंख्याही चारशेवर पोचली आहे. मात्र हे गाव पूर्णपणे जंगलात वसले आहे. परिणामी गावातील पाण्याचे स्रोत्र फ्लोराईडयुक्त आहेत. त्यामुळे गावातील अनेक लोक या पाण्याच्या आजाराचे बळी ठरले आहेत. दात पिवळी पडणे, ते वेडीवाकडी होणे, हातपाय दुखणे, सांधेदुखीचा त्रास या आजारांचा यात समावेश आहे.प्रारंभी लोकांना पुरेसे ज्ञान नव्हते त्यामुळे त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा या पाण्याच्या दुष्परिणामाविषयी कळू लागले तेव्हा या पाण्यापासून आमची मुक्तता करा, अशी एकमुखी मागणी ते करू लागले. २००५ पासून ते या मागणीचा पाठपुरावा करीत होते. पण या मागणीची एकाही लोकप्रतिनिधीने व अधिकाऱ्याने या मागणीचा व समस्येचा गांभीर्याने विचार केला नाही. दरम्यान या भागाचे जि. प. सदस्य संजय गजपुरे यांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा ही मागणी रेटून धरली. आणि अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून शुद्ध पाण्याचे वॉटर एटीएम लावण्याचे कामही सुरू झाले आहे. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजनाही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे.‘लोकमत’ने वेधले लक्षनवानगर या पूनर्वसन गावाच्या पाण्याच्या समस्येकडे लोकमतने अनेकदा वृृत्त प्रकाशीत करुन लक्ष वेधले होते. त्यामुळे आरोग्य यंत्राणा खळबळू जागी झाली. दरम्यान गावात वॉटर एटीएम मंजूर होऊन त्यांचे काम सुरु झाल्याने गावकºयांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.