शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

शेवटच्या माणसाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन तोच खरा विकास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:57 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : चिमूर क्रांतीभूमीत शहीद स्मृती दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : भारतीय स्वातंत्र्याची सुरुवात झालेली भूमी म्हणून चिमूरची ओळख आहे. चिमूर क्रांती लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलो. शहीदांना स्मरून शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन होते तोच खरा विकास आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शुक्रवारी स्थानिक बीपीएड मैदानावरील शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

यावेळी प्रमुख राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकमार भांगडिया. माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार मितेश भांगडिया, माजी आमदार अतुल देशकर, प्रकाश देवतळे, लक्ष्मण गमे, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मृतिचिन्ह प्रदान करताना आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया. उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आपल्याला जे मिळाले त्यामागे हुतात्म्यांचे बलिदान आहे. त्यामुळे शहिदांना कदापि विसरता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विकासकामांचे ई भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. संचालन अजहर शेख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

युवा पिढीला कळावा शहीदांचा इतिहासप्रास्ताविकात आमदार कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले, युवा पिढीला शहीदांचा इतिहास माहित व्हावा, त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. चिमूरचे अनेक प्रश्न मी मांडत आहे उपमुख्यमंत्री फडणवीस हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले. चिमूर क्षेत्राला कोट्यवधींचा निधी मिळवून दिला.

नागफना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी चिमूर येथील हुतात्मा स्मारकात शहीद विरांना मानवंदना अर्पण केली. त्यानंतर कार्यक्र- मस्थळी उपस्थिती दर्शविली.
  • कार्यक्रमाचे आयोजक आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते ना. फडणवीस यांना शहीद स्मारकाचा नागफना स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार केला.
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याने महिलांनी देखील ना. फडणवीस यांचा सत्कार केला.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrapur-acचंद्रपूर