शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

राजुरा मुक्तिदिन सोहळा उत्साहात साजरा

By admin | Published: September 20, 2015 1:35 AM

स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. हैद्राबाद मुक्तीसाठी लोकांनी मोठे आंदोलन केले.

मान्यवरांचा सूर : ‘त्या’ अनामिक स्वातंत्र्यविरांची समाजाने दखल घ्यावीराजुरा : स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. हैद्राबाद मुक्तीसाठी लोकांनी मोठे आंदोलन केले. बलिदान देण्यापासून येथील लोक कधीही मागे हटले नाही. स्वतंत्रता मिळाल्यानंतर काहीची नावे इतिहासात नोंदली गेली. परंतु स्वतंत्रता प्राप्तीसाठी एका संपूर्ण पिढीने मूल्यांची जोपासना करीत मोठा संघर्ष केला, अशा अनामिकांच्या नावाची इतिहासाने दखल घेतली नाही. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्यांची समाज दखल घेणार की नाही आणि स्वतंत्रता प्राप्तीनंतर आम्हाला अजूनही दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत का, असे परखड मत वक्त्यांनी मुक्तीसंग्राम दिनी आयोजित कार्यक्रमात केले. राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीतर्फे स्थानिक शिवाजी संकुलात मुक्तीदिन सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शा.वा. श्वान यांनी भूषविले. उद्घाटन पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून वर्धेच्या हिंदी विश्वविद्यालयाचे प्रा. डॉ. अनवर सिद्धीकी, आ. अ‍ॅड. संजय धोटे, माजी आ. अ‍ॅड.वामनराच चटप, सुदर्श निमकर, समन्वयचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, उपजिल्हाधिकारी विनोद हरकंडे, अनिल ठाकूरवार, अ‍ॅड. सदानंद लांडे, डॉ. सुरेश उपगन्लावार, अरुण मस्की, रमेश नळे, प्राचार्य दौलत भोंगळे, डॉ. उमाकांत धोटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, बंडू माणूसमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सरदार पटेल व रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमांना अभिवादन करुन व दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली. सोहळ्यात उपस्थितांच्या मनाचा ठाव घेत देश आणि समाज एकसंघ करण्यासाठी सर्वांनीे संकल्प करावा, असे प्रतिपादन करीत हैद्राबाद मुक्तीच्या इतिहासाची पाने श्रोत्यांसमोर उलगडूनन दाखविली.प्रास्ताविक डॉ. उमााकंत धोटे, संचालन किशोर कवठे व रंजिना चाफले आणि आभार वैशाली पावडे यांनी केले. स्वराप्रितीच्या अल्का सदावर्ते यांच्या संचाने सुंदर स्वागत गीत, गणेशस्तवण व शेवटी वंदेमारतम सादर केले. (शहर प्रतिनिधी)