शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

पीओपी मूर्र्तींच्या रंगांमुळे रामाळाचे पाणी प्रदूषित

By admin | Published: September 26, 2016 1:12 AM

गणेशोत्सव संपल्यानंतर ‘श्री’च्या मूर्तींचे शहरातील रामाळा तलाव व इतरत्र विसर्जन करण्यात आले.

चंद्रपूर : गणेशोत्सव संपल्यानंतर ‘श्री’च्या मूर्तींचे शहरातील रामाळा तलाव व इतरत्र विसर्जन करण्यात आले. त्यामुळे वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी रामाळा तलावात निर्माल्य काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यातून पीओपी मूर्ती व इतर मूर्र्ती बाहेर काढण्यात आल्या. चार-पाच दिवस झाले तरी पाण्यातील मूर्त्या मूळ स्वरूपात आहेत. त्या विरघळल्या नाहीत. त्या मूर्तींच्या रंगामुळे रामाळा तलावाचे पाणी प्रदूषित झाले. मच्छुआ संस्थेचे सभापती जगन पचारे, संतोष झा, लक्ष्मण तोकला, पांडुरंग गावतुरे, देवराव पिंपळकर, किसन पचारे, देवराव मंचर्लावार, लक्ष्मण ठाकरे, आनंदराव कस्तुरे, रामकिशन पचारे, रवी मंचर्लावार, राजू मंचर्लावार, दीपक पचारे, राहुल बक्कलवार, राहुल मंचर्लावार, रवी काम्पेलवार, क्रीष्णा तोकलवार, अक्षय गुम्मेलवार व मंडळातील सदस्यांना गणपती मूर्ती बाहेर काढताना फार त्रास झाला. मूर्त्यांना लावलेला रंग पाण्यावर पसरून पाण्याचा रंग बदलत होता. तो रंग तलावाच्या प्रदूषणात भर टाकत होता. त्यामुळे तलावातील मासे मरण पावले. दरवर्षीचे हे चित्र यावर्षीही दिसले. भोई बांधव जेव्हा पाण्यामध्ये उतरतात, तेव्हा मूर्त्यांच्या रंगामुळे त्यांच्या हाता-पायाला खाज सुटते. त्यांना बारिक पुरळ येणे, सर्दी-खोकला होत असतो. कधी-कधी तर चक्कर येत असतो. अशाही परिस्थितीत संस्थेचे सभासद आपली मजुरी सोडून तलावाचा ठेका आमचा आहे, त्याच्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. आज ना उद्या आम्हाला मच्छी पकडला येईल. त्यापासून दोन पैसे मिळेल, या आशेपोटी काम करीत असतात. पण प्रशासनाकडून १५ दिवसांत रामाळा तलाव स्वच्छ दिसला पाहिजे, असे बजावण्यात आले. तेव्हापासून गणपती विसर्जन झाल्यानंतर निर्माल्य काढण्यात येत आहे. त्याची मजुरी कधीही प्रशासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे कधी-कधी उपासमारीची पाळी येत असते.पीओपी मूर्तींवर बंदी आणली तरी त्याचा फारसा लाभ झालेला नाही. या मूर्त्या खरोखर बाद करायच्या असतील कडक कारवाई करून वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेला दिलासा द्यावा, असे एका पत्रकान्वये पांडुरंग गावतुरे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)