शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

बल्लारपूरलगत साकारतेय रानमेव्याचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:20 AM

साडेबारा एकर जागेवर १२ हजार ५०० मिश्र फळांची झाडे लावली मंगल जीवने बल्लारपूर : विविध प्रकारच्या आजाराशी लढण्याची आणि ...

साडेबारा एकर जागेवर १२ हजार ५०० मिश्र फळांची झाडे लावली

मंगल जीवने

बल्लारपूर : विविध प्रकारच्या आजाराशी लढण्याची आणि ती समूळ नष्ट करण्याची क्षमता व अद्भुत शक्ती रानमेव्यात आहे. यासाठी रोगातून पूर्णपणे मुक्ती मिळवायची असेल, तर वनौषधींचा आधार घेतला पाहिजे, असे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मत आहे. अशा रानमेव्याचा पर्याय आता बल्लारशाह वन परिक्षेत्रांतर्गत बल्लारपूर लगत असलेल्या मानोरा, उमरी, कवडजई ट्री पॉइंटवरील क्षेत्रात उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी रानमेव्याचे वन साकारत असून, याचा लाभ त्या परिसरातील लोकांना रोजगारासाठी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यांसाठी व रानमेव्याची चव चाखणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे.

मानोरा नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ४४९ मध्ये पावसाळ्यात लावलेल्या या रानमेव्याच्या वृक्ष लागवडीत विविध ४० मिश्र फळझाडांचे ५ फूट वाढलेली १२ हजार ५०० रोपे साडेबारा एकर पडक्या जमिनीवर लावण्यात आली आहे. यामध्ये वन्य प्राण्यांना आवडणारी, वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याच्या कामी येणारी व रानफळे चवीने खाणाऱ्या शहरी व ग्रामीण नागरिकांची आवडती फळे आहेत. यामध्ये औषधीच्या कामी येणारी कुंभी, मोहा, हिरडा, आवळा, गुंजा, रिठा, करू, अर्जुन, गूळ भेंडी, घोगर, तर रानमेवा खाणाऱ्यांसाठी बेल, आंबा, तेंदू, शेवगा, चिंच, जांभूळ, उंबर, कवट, बिबा, चारोळी, बादाम, खिरणी, टेटू, डाळिंब, सीताफळ, बोर, जांभ, वन्य प्राण्यांसाठी अमलतास, काकई, शिवण व इतर फळझाडे, प्राणवायू मिळण्यासाठी पिंपळ, वड अशी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली आहे. ही रोपे विसापूर, मानोरा, उमरी या उपक्षेत्रात उपवनसंरक्षक अरविंद मुंडे व वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली.

सदर रोपवन लावण्यात मानोरा ग्रामपंचायतच्या सरपंच जीवनकला ढोंगे, उपसरपंच लहुजी टिकले, सदस्य ऋषी पिपरे व इतर सदस्यांचा सहभाग होता.

बॉक्स

संरक्षण जाळी लावून होणार संवर्धन

सर्व झाडांना संरक्षण जाळी लावून त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. लावलेल्या या रानमेवा फळझाडांचा मानोरा व आजूबाजूंच्या ग्रामवासीयांना चार वर्षानंतर लाभ मिळणार आहे. यापासून त्यांना रोजगार प्राप्त होणार आहे. बल्लारशाह वन परिक्षेत्रात पहिल्यांदाच असे अनोखे रोपवन संतोष थिपे यांच्या कल्पनेतून साकारण्यात आले असून, भविष्यामध्ये हे रोपवन सर्वांसाठी प्रभावी ठरेल.

कोट

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणत, या रोपवनाशी गावकऱ्यांना वृक्षांशी नाते जोडण्याचा संदेश आम्ही दिला आहे. येथील जनतेने हा वसा जपला पाहिजे. मानोरा गावाला लागून हे रानमेव्याचे रोपवन असल्यामुळे या परिसराची शोभा वाढणार आहे. यासाठी सर्वांनी वृक्षाचे संगोपन, निगा व संवर्धनासाठी जागरूक असणे गरजेचे आहे. तेव्हाच रानमेव्याची हे वन यशस्वी होईल.

- संतोष थिपे, वन परिक्षेत्र अधिकारी, बल्लारपूर.