शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:24 AM

शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रातील चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपूर तालुक्यातील चेक माणकापूर येथील ऋषी मडावी यांचा २८ आॅगस्टला फवारणी करताना मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील येवती येथील मंगेश निकुरे हा संजय चिमूरकर या शेतकºयांकडे नोकर होता. मालकाच्या सांगण्यावरुन ४ सप्टेंबर रोजी कपाशीवर फवारणीसाठी गेला असता काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथे भरती केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोबतच अन्य शेतकऱ्यांनाही विषबाधा झाली आहे. परंतु फवारणी करताना वापरलेले कीटकनाशक कोणत्या कंपनीचे होते व कोणत्या कृषी केंद्रातून खरेदी करण्यात आले याची चौकशी करण्यात आली नाही. जिल्ह्यात बंदी असलेली कीटकनाशके अनेक कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कृषी केंद्रांची चौकशी करून संबंधित कंपनी व कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना सुरेश रामगुंडे यांच्यासह हिराचंद बोरकुटे, डी. के. आरीकर, डॉ. देव कन्नाके, अ‍ॅड. गणेश गिरीधर, रवी ढवस, रवींद्र बोरकर, सूर्यभान झाडे, धननजय जीवने उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी