शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

येल्लापूरच्या सरपंचाने थाटला समाज भवनात संसार

By admin | Published: March 10, 2017 2:00 AM

गावातील समाज बांधवांना सामाजिक कार्यक्रम व इतर कार्य करण्यासाठी एकत्र बसण्याची सोय व्हावी,

सरपंचाची हुकूमशाही : चौकशी करून कारवाई करण्याची मागणीजिवती : गावातील समाज बांधवांना सामाजिक कार्यक्रम व इतर कार्य करण्यासाठी एकत्र बसण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने आमदार निधीतून येल्लापूर येथील गोंडगुडा येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करून दिले. मात्र त्या सभागृहाचा वापर सामाजिक कायार्साठी न होता खुद सरपंचानेच आपला आटाचक्की व संसार चालविण्यासाठी करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी जिवती यांच्याकडे नागरिकांनी केली आहे. जीवती तालुक्यातील येल्लापूर ग्रामपंचायतीमध्ये चार गावे येत असून येथील लोकसंख्या १ हजार २५४ तर कुटुंब संख्या ४१८ आहे. गावात नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक सभागृहाची गरज नेहमीच पडत असते. परंतु सभागृह असूनही समाज कायार्साठी उपयोगी पडत नाही. गेल्या कित्येक वषार्पासून येथील सरपंच माधव कान्हु पेंदोर यांनी आपली हुकुमशाही दाखवित समाज भवनात अटाचक्की लावून संसार थाटल्याचा प्रकार गावकऱ्यांनी उजेडात आणला आहे. याबाबत नागरिकांनी जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र त्याकडे कोणीही लक्ष न दिल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. एकीकडे सरपंच म्हणजे गावचा पुढारी समजला जातो. त्यांच्या देखरेखीखाली गावातील संपुर्ण विकास कामे राबविताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे मात्र आपली हुकुमशाही दाखवून समाज भवनात संसार थाटतो अन् संबंधित विभाग याकडे कानाडोळा करतो, याला काय म्हणावे?सन १९९२-९३ मध्ये येल्लापूर ग्रामपंचायतीमध्ये जलद सिंचाई विभागामार्फत तलावाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याच तलावात अतिक्रमण करून माजी सरपंच सोनेराव पेंदोर यांनी विहिर खोदून शेतीसाठी पाणी वापरत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सरपंच माधव कान्हु पेंदोर व माजी सरपंच सोनेराव पेंदोर हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. त्यांचा अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीवर ताबा आहे. त्यामुळे हुकुमशाही दाखवित असून चौकशी करून कारवाईची मागणी तक्ररारीतून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)