शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पुराच्या पाण्यापासून गावाला वाचवा हो, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या पुरग्रस्त गावातील महिला

By साईनाथ कुचनकार | Published: June 20, 2023 3:31 PM

विविध मागण्यांचे निवेदन

चंद्रपूर : वेकोलीने नदीपात्रालगत उभारलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी पुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या राखेमुळे शेती नापिक झाली आहे. शासन स्तरावर वेळोवेळी निवेदने दिली. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. केवळ आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात तरी पुराच्या पाण्यापासून गावाचा वाचवा, या मागणीसाठी भद्रावती तालुक्यातील पिपरी दे. येथील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी देण्यात आले.

नदीकाठावर वेकोलीने मोठमोठे मातीचे ढिगारे उभारले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरते. मागील वर्षी पुरामध्ये गावातील दोघांचा जीव गेला. शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले. जनावरांचा चारासुद्धा खराब झाला होता. यानंतर शासन, प्रशासन जागे झाले आणि गावात दौरे केले. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत कायम उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

वर्ष उलटले मात्र अजूनही काहीही उपाययोजना झाल्या नाही. उलट मातीचे ढिगारे वाढतच आहे. ग्रामस्थांनी आजपर्यंत प्रशासनाला अनेक निवेदन दिले. मात्र न्याय मिळालाच नाही. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र, जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच संदीप खुटेमाटे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईfloodपूरriverनदीchandrapur-acचंद्रपूर