शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

निसर्गरम्य सिद्धेश्वर देवस्थान उपेक्षित

By admin | Published: September 20, 2015 1:27 AM

शासन गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. योजना गावकऱ्यांपर्यंत पोहचली तर त्या योजनेचे सार्थक, नाहीतर पर्यायाने त्या गावाचा विकास खुंटतो.

देवाडा : शासन गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. योजना गावकऱ्यांपर्यंत पोहचली तर त्या योजनेचे सार्थक, नाहीतर पर्यायाने त्या गावाचा विकास खुंटतो. देवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर देवस्थानापर्यंतही शासनाची कृपादृष्टी पडलेली नाही. पुरातन काळातील व राजुरा येथून १८ किमी अंतरावरील तेलंगाना मार्गावरील सिद्धेश्वर धार्मिक स्थळ व देवस्थान आहे. मात्र हे देवस्थान सध्या उपेक्षित आहे.सिद्धेश्वर फाट्यावरुन दोन किमी अंतरावर जंगलाच्या मध्यभागी हिरव्यागार रानात जंगली प्राणी असलेल्या या ठिकाणी महादेव शंकर यांचे मंदीर आहे. सिद्धेश्वर देवस्थान म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात व तेलंगाणात हे स्थळ प्रसिद्ध आहे. परंतु मागील वर्षापासून सिद्धेश्वर देवस्थानाचे बांधकाम कासवगतीने सुरू असून या बांधकामाला पूर्णपणे यशस्वी करण्याकरिता दोन वर्ष लागेल, असे बोलले जात आहे. यामुळे देवाडा सिद्धेश्वर परिसरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होताना दिसून येत आहे. सिद्धेश्वर देवस्थानात प्रस्तुत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता सध्या देवस्थानाचे बांधकाम पूर्णपणे बंद अवस्थेत आढळून आले आहे. पाऊस आला की मंदिराच्या आतमधून पाणी गळते. पावसाचे पाणी मंदिरामध्ये साचून राहते. तसेच एक हातपंप आहे आणि पुरातन काळातील जलकुंडात पाणी पिण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी राहते. परंतु जलकुंड लहान स्वरूपात असल्यामुळे त्याचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. हजारो भाविक देवदर्शनाला या ठिकाणी येतात. महाशिवरात्री, श्रावण महिण्यात मोठ्या संख्येने नागरिक येऊन यात्रा भरविण्यात येते. परंतु पाण्याची टंचाई भासते. अशा अनेक समस्या आहेत. सिद्धेश्वर देवस्थान कमेटीतर्फे देखरेखच केली जात नसल्याने कमेटी फक्त कागदावरच आहे, असे दिसून येत आहे. तरी सिद्धेश्वर देवस्थान कमेटीला बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या परिश्रमाने पुरातन काळातील सिद्धेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ७८ लाखांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या पुरात्तत्व विभागाकडून मंजूर झाला. सन २०१२-१३ पासून मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या निष्काळजी व दुर्लक्षपणामुळे तीन वर्ष लोटूनही काम अपुरेच आहे. जी दूरदृष्टी ठेवून मंदिराचा जिणोध्दार होत आहे, ती अपुरी राहते की काय, असे दिसते.प्रेमीयुगलांचे जत्थे सिद्धेश्वर देवस्थानाकडे !शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुलांचा मुलींशी संपर्क येतो. यातूनच त्यांची मैत्री होते आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेम संबंधात होते. मग महाविद्यालयातील गर्दीतून वाट काढत ही तरुणाई एकांताच्या शोधात शहराबाहेर जाऊ लागते. सध्या अशी प्रेमीयुगलांची जोडपी सिध्देश्वर देवस्थान परिसरात फिरताना दिसून येत आहेत. मात्र हा एकांत त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. होय, अशाच प्रेमीयुगलांवर काही विकृत प्रवृत्तीच्या टोळक्यांची नजर असून अनेक जोडप्यांना वाईट अनुभव आला असला तरी बदनामीच्या भीतीपोटी अनेक प्रकरणे बाहेरच आली नाही. परिणामी विकृतांची हिंमत वाढत आहे.