शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! सव्वा लाख नागरिकांची सुरक्षा केवळ १०० पोलिसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 12:04 IST

Chandrapur : अपुऱ्या मनुष्यबळावर बल्लारपूर ठाण्याचा कारभार

मंगल जीवने लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर: येथील पोलिस ठाण्यांतर्गत २२ गावांमधील सुमारे १ लाख २१ हजार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केवळ १०० पोलिस अधिकारी, कर्मचारी सांभाळत आहेत. यामुळे सुरक्षात्मक उपाययोजनांमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, शहर व गावांमध्ये सुरू असलेले जुगार, मटका, अवैध दारू, गौण खनिजांची वाहतूक रोखण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

सध्या ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, ३ पोलिस उपनिरीक्षक व ९० च्या जवळपास पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येसाठी ही संख्या अपुरी आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतर अडचणींचा सामना पोलिस ठाण्याला करावा लागत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहराच्या महत्त्वपूर्ण चौकातून ट्राफिक पोलिस दिसेनासे झाले आहेत. पोलिस चौक्या बंद आहेत, त्या उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीची गस्त कमी प्रमाणात होते. पोलिसांची अपुरी संख्या असल्यामुळे पोलिसांना ठाण्यात जास्त वेळ द्यावा लागतो. बल्लारपूर पोलिस ठाण्यांतर्गत चार बिट, दोन आरोग्य व ग्रामीण रुग्णालय, सहा महापुरुषांचे पुतळे, १८ मशीद, १३ चर्च व ३१ मंदिरांचा समावेश आहे. त्याचबरोबर ठाण्यापासून २८ किलोमीटर एवढ्या लांब अंतरावर असलेल्या हद्दीत २२ गावे आहेत. या गावांतील १ लाख २० हजार २६९ लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी जवळपास १०० पोलिस कर्मचारी पाहतात. उत्सवासाठी, गस्त घालण्यासाठी हे कर्मचारी कमी पडतात.

असे आहे पोलिस ठाण्यातील मनुष्यबळ

पोलिस निरीक्षक १, सपोनि ३, पोउपनि ३. चालक ४, बिट जमादार ४, बिट मदतनीस ४, मोहरील १, हजेरी १, तसेच क्राइम, गुप्त वार्ता व वायरलेस १, उपविभागीय कार्यालय, राजुरा, कोर्ट-३.

आणखी ४३ कर्मचाऱ्यांची गरज अनेक वर्षापासून या पोलिस ठाण्याला लोकसंख्येनुसार मनुष्यबळाचा कोटा दिलेला आहे. तो अद्यापही कायम आहे. वास्तविक पाहता आजघडीला लोकसंख्या वाढली आहे. त्यानुसार कर्मचारी संख्या वाढणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. सध्या तरी ४३ च्या वर पोलिस कर्मचारी गरजेचे आहेत.

कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा तनाव कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून, त्याचा परिणाम शरीर प्रकृतीवर होत आहे. गेल्या एक वर्षापासून वरिष्ठांकडे पोलिस कर्मचारी वाढवून देण्याची मागणी होत आहे. परंतु, वाढीव पोलिस कर्मचारी अजूनपर्यंत मिळाले नाहीत.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर