शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

स्व. कन्नमवारजी, आम्हाला माफ करा..!

By admin | Published: January 14, 2016 1:24 AM

ज्या मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी आपली संपूर्ण हयात अखील समाजासाठी घालविली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ...

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरज्या मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी आपली संपूर्ण हयात अखील समाजासाठी घालविली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत: कारागृह आणि हालअपेष्टा भोगून इतिहासात स्वत:चे नाव कोंदले, स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्रिपद भूषविले, सह्याद्रीने हिमालयाला साद घातली आणि हिमालय धावून गेला असा सन्माननीय उल्लेख ज्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल होतो. त्या महाराष्ट्रभूषण यशवंतराव चव्हाण यांच्या हाकेला ओ देत हा विदर्भपूत्र धावून गेला. त्या दादासाहेबांचे कार्य मोठे असले तरी आम्ही ते ओळखू शकलो नाही. माफ करा दादासाहेब...दादासाहेबांच्या कार्याची जाणीव चंद्रपूरकरांना सदोदित व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हा परिषदेने २४ नोव्हेंबर १९७० मध्ये वसंत भवन समोर पुतळा उभारला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते आणि तत्कालीन ग्राम विकास मंत्री नरेंद्र तिडके यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. पण दुर्देवाने तोच पुतळा आज कचऱ्यात आणि झुडूपात उभा आहे. माफ करा मा.सा. साहेब, आम्ही आपणास ओळखू शकलो नाही.हा देश इंग्रजांच्या तावडीत होता, परसत्तेच्या आक्रमणाखाली सारी जनता पिचून चालली होती. दिल्ली, मुंबईत काय घडत आहे हे टोकावर राहणाऱ्या चंद्रपुरातील जनतेला कळत नव्हते, तेव्हा आपणच चंद्रपुरातील गांधी चौकामध्ये रोज फळयावर घटनांच्या हेडलाईन्स आणि माहिती लिहून जनजागरणाचे कार्य केले. काँग्रेस भवनामध्ये कितीतरी वेळा रात्र रात्र जागून कार्यकर्त्यांंच्या बैठका घेतल्या. झोपायचीही सोय नसायची, तेथीलच बेंचवर अंगाचे मुळकुटे करून रात्रीची झोप घेतली, सकाळी लवकर उठून कामाला लागता यावे म्हणून ! इंग्रज सत्तेविरूद्ध संघटन उभारले. काँग्रेसच्या संघटन बांधणित मोलाची भूमिका बजावली. उत्तम संघटक, कार्यकर्ता आणि समाजसेवक कसा असावा, याचा परिपाठ आपण आपल्या कृतीतून उतरविला. दादासाहेब, आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या त्यागातून आणि कठोर परिश्रमातूनच आम्हाला सत्तेची फळे चाखायला मिळत आहेत. स्वातंत्र्यासाठी आपण खस्ता खल्ल्या म्हणून आम्ही सत्तेची पदे उपभोगत आहोत. पण माफ करा, दादासाहेब, आम्ही आपला त्याग विसरलो.चंद्रपुरातील आपला पुतळा कशा अवस्थेत उभा आहे, हे कदाचित आपण वरून बघत असालही. त्याबद्दल आपणास दु:खही होत असेल. पण माफ करा दादासाहेब. आपला पुतळा कुणाच्या कक्षेत येतो हे आम्हाला आधी ठरवू द्या, नंतरच स्वच्छतेचे काय ते बघू. पुतळा जिल्हा परिषदेने उभारला. जबाबदारी त्यांची आहे की, महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने मनपाची आहे, हा वाद आधी दूर होऊ द्या. पत्र आल्याशिवाय आणि विचारल्याशिवाय स्वच्छता करायची नाही, असा महापौरांचा दंडक आहे, बरे का. अर्ज द्याल तर आपला ले-आऊटही महापौर स्वच्छ करून देणार आहेत. पण अर्ज लागेलच. दादासाहेब, आता आपणच पृथ्वीवर या आणि महानगर पालिकेत जावून स्वत:च्या पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी अर्ज द्या. त्याशिवाय आम्ही हलणार नाही. कारण आम्ही सत्ता आणि पदात धुंद आहोत. आपल्या मोठेपणाशी आम्हाला देणेघेणे नाही. दादासाहेब, माफ करा, सवड मिळाली तर स्वच्छतेचे पाहू.