शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

सात धरणे ‘ओव्हरफ्लो’

By admin | Published: September 27, 2016 12:44 AM

मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून...

जनजीवन विस्कळीत : परतीचा पाऊस थांबता थांबेना चंद्रपूर : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही नद्यांना पूर आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे आधार असलेल्या व उन्हाळ्यात ड्राय झालेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून घोडाझरी, डोंगरगाव हे दोन सिंचन प्रकल्प शंभरी गाठण्यावर आले आहेत. गेल्या बुधवारपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असून या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत असल्याने आता बस्... पाऊस नको, असे अनेक नागरिक बोलून दाखवित आहेत. या पावसाने भारी धान पिकाला फायदा होत असला तरी इतर पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक पावसामुळे चिंतेत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. पाटबंधारे विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर गेल्या २४ तासात जिल्ह्यात २६.२८ च्या सरासरीने ३९४.३ मिमी पावसाची नोंद झाली. तर १ जूनपासून आजपर्यंत १३३३.४६ च्या सरासरीने २०००१.९ मिमी पाऊस झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पावसाने घर कोसळलेबाखर्डी : सततच्या पावसाने घर पडल्याची घटना कोरपना तालुक्यातील निमणी येथे घडली. यात भाऊराव ढावस यांचे मातीचे घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेजारचे बोबडे व ढवस यांचेही मोठे नुकसान झाले असून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. ब्रह्मपुरी तहसील कार्यालयावर कोसळली वीज ब्रह्मपुरी : सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसात येथील तहसील कार्यालयावर वीज कोसळल्याची घटना घडली. यात संगणक व इतर साहित्य जळाल्याने चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटाने तहसील कार्यालय परिसर हादरून गेला. कार्यालयाजवळील टॉवरवर वीज कोसळल्याने सुरू असलेले तहसील कार्यालयाचे ११ संगणक, इंटरनेट मोडम, प्रिंटर्स, वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले. यात चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती विद्याधर चव्हाण यांनी दिली आहे.