शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोकळ्या जागांवर झुडपांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 21:56 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घडू शकते.

ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष : सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे धोका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घडू शकते. मात्र या अनावश्यक गवत व झाडेझुडुपा महानगरपालिका प्रशासन गोंजारत बसल्याचे दिसून येते. नागरिकांनी तक्रारी करूनही सफाई कर्मचारी नकार देत असल्याने हा कचरा आणखी वाढत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.आॅगस्ट महिन्याचा पहिला पंधरवाडा सुरू आहे. या महिन्यात चंद्रपूर शहरात बºयापैकी पाऊस झाला. जुलै महिन्यातही पाऊस आला होता. या पावसामुळे चंद्रपुरातील अनेक मोकळ्या जागांवर अनावश्यक झुडुपे, गवत वाढले आहे. घराच्या शेजारी, पटांगणातही हा हिरवा कचरा वाढला आहे. चंद्रपुरातील अनेक वसाहतीमधील घरांकडे जाण्यासाठी पायवाट आहे. ही पायवाटही या कचºयाने गिळंकृत झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास अशा वाटेने जाताना साप, विंचूवर पाय तर पडणार नाही ना, अशी भीती नागरिकांना असते. महानगरपालिकेचे सफाई कामगार महिन्यातून, काही ठिकाणी दोन महिन्यातून एकदा नाल्यांचा उपसा करायला येतात. नाल्यांचा उपसा केल्यानंतर हे सफाई कामगार केवळ नाल्यांच्या काठावरील गवत व अनावश्यक झाडे तोडतात. मात्र घराच्या सभोवताल असलेले गवत, पटांगणातील हिरवा कचरा साफ करीत नाही. घरातील लोकांनी आर्जव केली तरी हे सफाई कामगार ‘आमचे हे काम नाही’, असे सांगत याकडे दुर्लक्ष करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने मोकळ्या जागांवरील, पटांगणावरील व घराच्या भोवताली असलेल्या या झुडुपांमध्ये साप, विंचू यासारख्या विषारी सरपटणाºया प्राण्यांचा वावर असू शकतो.मनपाकडून अपेक्षामहानगरपालिका प्रशासनाने आपल्या सफाई कामगारांच्या माध्यमातून शहरातील विविध घराशेजारी व पटांगणात असलेले अनावश्यक झाडे, गवतांवर फावडा चालवून ते साफ करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मनपाने आजवर ही मोहीम राबविली नाही. मात्र यावेळी मनपाने ही मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.डासांचा प्रचंड प्रादुर्भावशहरातील मोकळ्या जागा, रिकामे प्लॉट्स यामध्ये झाडेझुडुपे तर आहेच. शिवाय खोलगट भागात पावसाचे पाणीही साचून आहे. त्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या डासांचा त्या परिसरातील लोकांना मोठा त्रास होत आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारालाही आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका