शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

ओबीसींच्या प्रश्नावरून काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:20 AM

चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करावे या मागणीसह इतर मागण्यांना घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ...

चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करावे या मागणीसह इतर मागण्यांना घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाड यांना दिले.

यावेळी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, धोपटाळाचे सरपंच राजू पिंपळशेंडे, गुरुदास चौधरी, विवेक खुटेमाटे, आदींची उपस्थिती होती.

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु, केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

ओबीसींची जनगणना करावी, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप द्यावी,चंद्रपूर- गडचिरोली सह राज्यांतील आठ जिल्ह्यांत ओबीसीचे नोकरीत कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसींना त्यांचे लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, एससीएसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांनाही शासकीय योजनांचा लाभ मिळावा, आरक्षणाची ५० टक्के असलेली कमाल मर्यादा वाढवावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.