शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

वन कामगारांची अवस्था अनाथांसारखी

By admin | Published: May 10, 2017 12:51 AM

ज्यांना आई - वडिलांचा पत्ता नाही. ज्यांना जात नाही. स्वत:चे आडनावदेखील माहिती नाही, अशा अनाथ मुलांना अनाथ आश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो.

रमेश दहिवडे : विदर्भ वन कामगार संघटनेचा मेळावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्यांना आई - वडिलांचा पत्ता नाही. ज्यांना जात नाही. स्वत:चे आडनावदेखील माहिती नाही, अशा अनाथ मुलांना अनाथ आश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. त्यांच्या निवास, जेवणाची व्यवस्था अनाथ आश्रमाच्या वतीने केली जाते. तरीही या मुलामुुलींना १८ वर्ष पूर्ण होताच अनाथ आश्रमातून काढून टाकले जाते. स्वत:ची काही ओळख नाही, खिशात रुपया नाही, अशा अवस्थेत त्यांना कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. याच अवस्थेत आज वन कामगारांनाही जगावे लागत आहे, अशी टीका विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.वन कामगारांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. दहिवडे म्हणाले की, काम असताना ९० दिवस पूर्ण झाल्याच्या नावाखाली रोजंदारी वन कामगारांना कामावरुन कमी केले जाते. तेव्हा या वन कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचे काय, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. १२ महिने कामावर राहणारे वन अधिकारी शासनाचा आदेश आहे, असे निर्लज्जपणे सांगून नवीन कामगारांना घेतात. रोजंदारी कामगारांची बाजू उचलून धरणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यापूर्वी दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याकडे लक्ष देतील व वन कामगारांना अनाथ कामगाराप्रमाणे नव्हे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देतील, अशी अपेक्षा प्रा. दहिवडे यांनी व्यक्त केली आहे.