शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
3
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
4
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
6
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
7
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
8
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
9
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
10
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
12
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
13
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
14
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
15
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
16
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
17
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
18
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
19
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
20
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

वसतिगृहातील विद्यार्थी जिल्हा कचेरीवर धडकले

By admin | Published: September 18, 2016 12:55 AM

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासन नानाविध योजना राबवित असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे.

कंत्राटदाराचा मनमानी कारभार : दिले जात आहे निकृष्ट आणि अपुरे जेवण चंद्रपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासन नानाविध योजना राबवित असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे. पोटभर आणि विद्यार्थ्यांनी ठरविलेला मेनू जेवणात द्यावाच लागेल, असा शासकीय नियम असतानाही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट आणि अपुरे जेवण दिले जात आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी काल शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.येथील समाजकल्याण विभाग कंत्राटदाराच्या मदतीने सध्या वरणभात नावाचा उपक्रम राबवित असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सर्व नियम सबंधित कंत्राटदार पायदळी तुडवित आहे. विद्यार्थ्यांना पुरेसे अन्नही देत नाही. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.समाजकल्याण विभागाचे येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. जिल्हाभरातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्टया कमकुवत विद्यार्थी येथे राहतात. प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे येथे एकूूण ६५ विद्यार्थी आहेत. या वसतिगृहातील खानावळीचे कंत्राट अग्रवाल नामक व्यक्तीला मिळाले आहे. मागील दोन वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नियमानुसार विद्यार्थी आणि कंत्राटदार मिळून मेनू सांगतात. तो सर्वसंमतीने ठरल्यानंतर तो द्यावाच लागतो. परंतु कंत्राटदार मनात येईल तसे जेवण विद्यार्थ्यांना देतो. याची तक्रार केली तर कंत्राटदाराकडून दमदाटी केली जाते. त्यामुळे आजपर्यंत प्रकरण वसतिगृहाच्या बाहेर आले नव्हते. मात्र अखेर विद्यार्थ्यांचा राग गुरुवारी रात्री अनावर झाला. कंत्राटदाराने विद्यार्थ्यांना केवळ वरण आणि भातच खायला दिले. विद्यार्थ्यांनी खाण्यास नकार दिला. संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सूचना केल्या. त्यानंतर रात्री दीड वाजता विद्यार्थ्यांना जेवण मिळाले. दरम्यान नेहमीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.गृहपाल रात्री उपस्थित नसतातया वसतिगृहात गृहपाल म्हणून महिला आहे. त्या सध्या प्रसूती रजेवर आहेत. त्यांच्या जागी वरोरा येथील एकाची प्रभारी गृहपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेही रात्री उपस्थित नसतात, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.