शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Published: March 04, 2017 12:42 AM

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमाणात आणण्यासाठी व आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थगिती व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली.

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमाणात आणण्यासाठी व आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थगिती व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली. परंतु, शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शैक्षणिक सत्र संपून दुसरे सत्र सुरु झाले असतानासुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.आदिवासी मुले शाळाबाह्य राहू नये. शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी विविध योजना राबवित आहे. त्यासाठीच आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सूवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना आदिवासी विभागातंर्गत लागू करण्यात आली. या शिष्यवृत्तीमुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येण्यास मदत होईल. व शिक्षणात त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी होईल, असा मुख्य उद्देश आहे. मात्र, शैक्षणिक सत्र संपूर्ण दुसरे सत्र सुरु होत असतानासुद्धा शिक्षण विभगाच्या दिरंगाईमुळे अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये सदर शिष्यवृत्ती जमा करण्यात आली नाही. मागील सत्रात संबंधीत शिष्यवृत्ती आॅनलाईन केल्याने सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन आदिवासी विभागाने धनादेशासहीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे दिले. परंतु या बाबीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शैक्षणिक सत्र संपूनही दुसरे सत्र सुरु झाल्यानंतरही शिष्यवृत्ती मिळत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे. पूर्वी विद्यार्थ्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाच्या खात्यावर सूवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती जमा करुन त्याचे वितरण केले जात होते. परंतु, यावर्षीपासून आॅनलाईन शिष्यवृत्ती केल्याने समस्या निर्माण झाली असून बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यास शिक्षण विभाग दिरंगाई दाखवत आहे. मागील सत्रात प्राथमिक शिक्षक संघाने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात यावे, ही मागणी लावून धरली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत शिष्यवृत्ती जमा करण्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी हमी दिली होती. परंतु तालुक्यातील विद्यार्थी बँकेमध्ये वारंवार फेरफटका मारत आहे. शिष्यवृत्ती जमा न झाल्याने रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)